Skip to main content

Posts

Showing posts from 2014

रायगड प्रदक्षिणा...

६ जून २०१४ शिवराज्याभिषेक सोहळा - मराठ्यांच्या इतिहासातील सर्वोच्च आनंदाचा क्षण. रायगडावर याच दिवशी ३४० वर्षांपुर्वी शिवाजी महाराज सार्वभौम राजे झाले होते. इतक्या वर्षांनंतरही अगदी त्याच जोमात महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर साजरा केला जातो. मीसुद्धा गेली २ वर्षे न चुकता आपली हजेरी रायगडाच्या दरबारी लावत आलो आहे. यावर्षी सुट्ट्यांच्या घोळामुळे रायगडी जाणे तसे साशंक वाटत होते, पण अगदी शेवटच्या क्षणी आलेला एक phone call सगळी समीकरणे बदलून गेला. रायगड पुण्याहून गाठायचा ठरले तेही एक दिवस आधीम्हणजे ५जून ला. लवकर जाण्याचे एक मोठे कारण होते ते म्हणजे रायगडाची प्रदक्षिणा. ठरल्याप्रमाणे सर्व (विशाल नाईकवाडी, बोम्बल्या फकीर, मी आणि माझा भाऊ) ११.३० पर्यंत रायडाच्या पायथ्याशी भेटणार होतो. पण कुठे माशी शिंकली कोण जाणे १ वाजले तरी या दोघांचा काही पत्ता नव्हता. mobile network फारच weak असल्याने संपर्क करणे तसे कठीण होते. वाट बघण्याशिवाय कोणता पर्याय आमच्याकडे नव्हता, माझा भाऊ आणि मी बराच वेळ चित्त दरवाजासमोर उभे राहिलो. अखेर ३.३० वाजता या लोकांची गाडी आमच्यासमोर आली. सुटकेचा निश्वास टाकत जास्...

आयुष्य खुप सुंदर आहे आणि थोड़ी सुरक्षा घेतली की आणखी सुंदर बनते.

प्रिय मित्रांनो, सांगायचे असे की पावसाळा बर्यापैकी चालु झाला आहे. चार महीने राकट रूप दाखवलेल्या वसुंधरेन आत्ता नाजुक नव्या नवरीच रूप धारण केल आहे. अनेक नवे-जुने ओहोळ स्वच्छ आणि निर्मळ पाण्याने दुथडी भरुन वाहत आहेत. डोंगररांगा आणि त्यावरच्या शिखरांनी तर हिरवा रंग परिधान करून स्रुष्टिच्या नव्या रुपाच्या स्वागताची तयारी केली आहे. डोंगरावरून वाहणारे असंख्य धबधबे जणू दुधाची बरसात करत आहेत आणि काही उंच  डोंगर आणि शिखरे जी काही मागील महीने उन्हाच्या तापात जळत होते ते आत्ता तर ढगांच्या गालिच्यावर निवांत निद्रावास्थेत आहेत. ही सगळी स्वर्ग साधने पाहून कोणीही भारुनच जाईल म्हणजे सामान्य माणूसच नाही तर देव सुद्धा नाचतिल. अर्थातच हे आहेच इतक सुंदर आणि मन-लोभस. तुम्हाला ते सृष्टि सौंदर्य साद घालतय तुम्ही जा आणि त्याचा अखंड आनंद घ्या. पण हे सगळ वर्णन तर तुम्ही तुमच्या घराशेजारी किंवा प्रवासात अनुभवता आहात मग माझ्या सांगण्याचा काय फ़ायदा. माझ्या सांगण्याचा एकच उद्देश मित्रांनो की मजा करा पण काळजी ही घ्या स्वतःची आणि आपल्याबरोबर आलेल्या हौशी मित्रांची. पावसाळी सप्ताह सुट्टी घेउन निघालेल्या आण...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

सफर भन्नाट AMK ची : भाग -3

सफर भन्नाट AMK ची : भाग -२ सफर भन्नाट AMK ची : भाग -1 गुहेत सगळीकडे अंधार पसरला होता आणि आमच्या पोटात आता कावळे ओरडायला लागले होते. आजच्या जेवणाची जबाबदारी मी स्वतःवर घेतली होती. मग खिचडी भात बनवून त्यावर ताव मारला. या trek मध्ये खाण्याच्या बाबतीत मागील काही trek पेक्षा जास्त royalness दिसुन आला तो म्हणजे राजू सरांनी आणलेल्या बदाम, काजू, खजूर, रेवड्या, पेढे अशा अनेक पदार्थांमुळे. आता मात्र मनसोक्त गप्पा आणि विनोदाचं session रंगणार होतं. मनसोक्त गप्पा मारून, सगळं काही आवरून मग आम्ही आपापल्या अंथरूणात उडी घेतली. थंडी बरीच होती. त्यामुळे रात्री झोपलेल्या जागीच सकाळी जाग येणे तसे अवघडच. कुलंगच्या त्या गुहेत अगदी शांत झोपेत असतानाच पहाटे एक आवाज येतो " उठा रे सुर्योदय होणार आहे " आणि सर्व लगबगीने उठून आपापला camera घेऊन बाहेर पडतात. Trek वर असतानाचा हा दुसरा सुर्योदय आमच्या वाटेला आला. या सुर्योदयाचं महत्व फार जास्त या कारणाने की तिथुन मागील २ दिवसात पादाक्रांत केलेले दोन्ही गड एका दृष्टिक्षेपात दिसुन येत होते. संपूर्ण गड फिरून मनसोक्त photography करून आम्ही पुन्हा गुहेत प...

सफर भन्नाट AMK ची : भाग -२

सफर भन्नाट AMK ची : भाग -1 सकाळचे ५.३० वाजले तसा सरांनी मला आवाज दिला, घरी एका हाकेत कधीही न ऊठणारा मी खाडकन जागा झालो. क्षणाचाही विलंब न लावता camera घेऊन सगळे वीर निघाले सुर्याचा मागोवा घेत. ६.३० वाजून गेले बऱ्यापैकी तांबडं फुटलं होतं. डाव्या हाताला नवरा-नवरी सुळक्यांसह दुरवर कळसुबाई ठामपणे मी महाराष्ट्रात सर्वोच्च आहे अशी बतावणी करत होता. तर उजव्या बाजूला भंडारदऱ्याच्या पाणलोट क्षेत्राच्या अगदी बाजूलाच उभा असलेला रतनगड काहीतरी खुणावत होता. तेवढ्यात सुर्यदेव अवतरले आणि त्यांना आपापल्या camera मध्ये टिपण्याची जणू स्पर्धाच आमच्यात सूरू झाली. सुर्यदेव अवतरले भंडारदऱ्याच्या पाण्यात सुर्यकिरणे पडल्यावर त्याचे ते सौंदर्य मोहून टाकणारे होते. सोनेरी जलाशय व आजुबाजुचा परिसर सुर्याच्या प्रकाशात न्हाऊन निघाला होता. पाय काढता काढवत नव्हता पण आज बरच चालायचं होतं त्याकारणाने अलंग संपूर्णपणे न्याहाळून गुहेच्या परिसरात असलेल्या पाण्याच्या टाक्याजवळ थांबून मग आम्ही मदनच्या दिशेने कूच केली.  अलंगला मागे टाकत आम्ही निघालो बहुचर्चित मदन किल्ल्याकडे, वाटेत पहिल्यांदा आडवा आला तो अलंगचा...

सफर भन्नाट AMK ची भाग -१

जवळ-जवळ महिनाभरापूर्वी AMK करायचा असे मनात आले आणि राजू सरांना चौकशी करायला सांगितले. सरांनी सर्व चौकशी करून मग तारिख final करायला मला call केला आणि 31,1,2 feb तारिख पक्की झाली. सुरवातीला मी, राजू सर, दत्तू दादा आणि सलीम भाय(सुरेश भालेराव), किरण बानखेले एवढेच member जायचं fix झालं होत पण मग कुठुनतरी वसिम भाय(विशाल नाईकवाडी) ला आमचा plan कळाला आणि मग बोम्बल्या दादासंग तो trek मध्ये add झाला. आता ओढ लागली होती ती प्रत्यक्ष ट्रेकचा दिवस कधी उजाडेल त्याची. Pre-planning whatsapp वर सुरु झाली होती. जसा-जसा trek चा दिवस जवळ येत होता तसे-तसे काही member विविध कारणास्तव cancel होत गेले. राजू सर आणि मी मात्र ठाम राहिलो म्हंटलं अगदी कोणी आलं नाही तरी चालेल आपण दोघं जायचच. ३० तारिख उजाडली आणि मग एकच धावपळ सूरू झाली. मी संध्याकाळीच राजू सरांकडे ओतुरला पोहोचलो, तिथे वसिम भाय आधीच हजर होता. जेवण वगैरे करून गप्पा गोष्टी करत मग आम्ही पडी घेतली. सकाळी लवकर आवरून आम्ही राजूरला पोहोचलो तिथून मग सलीम भाय ला उचलला आणि तथाकथित AMK च्या दिशेने कूच केली. भंडारदरा धरण, रतनगड परिसर, कळसुबाईची मागची बाजू तुडवत आ...

सर्व trekkers मित्रांना एक विनंती...

सर्व trekkers मित्रांना एक विनंती  काही दिवसांपूर्वी एक गिर्यारोहक गडप्रेमी असलेल्या कोण्या एका ट्रेकर मुलाचे फोटो पाहिले ( नाव गुपित ठेवण्यात आले आहे ) त्या मुलाने हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्याच्या धोकादायक रेषेपुढे आपले फोटो काढून मोठा पर ाक्रम गाजविला आहे... त्या फोटोत अक्षरश: "खतरा" असे वाक्य धोकादायक रेषेवर लिहिलेले नावही दिसत आहे...  सह्याद्री... डोंगर द-या, कडेकपारी, ओढे नाले, गड किल्ल्यांनी नटलेला राकट पैलवान... त्याच्या अंगाखांद्यावर बिनधास्त भटकताना तो आपणास कधी धोबीपछाड देईल सांगता येत नाही... खर सांगायच झाल्यास सह्याद्रीत फिरताना स्वत:सोबत इतरांचीही काळजी घ्या... तुम्हा सारख्यांची प्रेरणा घेऊनच नवीन मुलांचे पाऊल गडकिल्ल्यांकडे वळत आहे.. तुम्ही प्रस्तरारोहण करत असाल किंवा एखाद्या कड्याच्या, अवघड जागेच्या ठिकाणी काढलेल्या फोटोखाली तुम्ही घेतलेल्या खबरदारीची माहिती जरुर द्या... किंवा असे फोटो फेसबुकवर पोस्ट करणे टाळा..... उगाच असे photo post करून मिळणाऱ्या प्रसिद्धीपेक्षा तुमचे हे photo बघुन एखादा तसच करण्याच्या नादात आपला तोल गमावून बसतो आणि कदाचीत प्...