प्रिय मित्रांनो, सांगायचे असे की पावसाळा बर्यापैकी चालु झाला आहे. चार महीने राकट रूप दाखवलेल्या वसुंधरेन आत्ता नाजुक नव्या नवरीच रूप धारण केल आहे. अनेक नवे-जुने ओहोळ स्वच्छ आणि निर्मळ पाण्याने दुथडी भरुन वाहत आहेत. डोंगररांगा आणि त्यावरच्या शिखरांनी तर हिरवा रंग परिधान करून स्रुष्टिच्या नव्या रुपाच्या स्वागताची तयारी केली आहे. डोंगरावरून वाहणारे असंख्य धबधबे जणू दुधाची बरसात करत आहेत आणि काही उंच डोंगर आणि शिखरे जी काही मागील महीने उन्हाच्या तापात जळत होते ते आत्ता तर ढगांच्या गालिच्यावर निवांत निद्रावास्थेत आहेत. ही सगळी स्वर्ग साधने पाहून कोणीही भारुनच जाईल म्हणजे सामान्य माणूसच नाही तर देव सुद्धा नाचतिल. अर्थातच हे आहेच इतक सुंदर आणि मन-लोभस. तुम्हाला ते सृष्टि सौंदर्य साद घालतय तुम्ही जा आणि त्याचा अखंड आनंद घ्या. पण हे सगळ वर्णन तर तुम्ही तुमच्या घराशेजारी किंवा प्रवासात अनुभवता आहात मग माझ्या सांगण्याचा काय फ़ायदा. माझ्या सांगण्याचा एकच उद्देश मित्रांनो की मजा करा पण काळजी ही घ्या स्वतःची आणि आपल्याबरोबर आलेल्या हौशी मित्रांची. पावसाळी सप्ताह सुट्टी घेउन निघालेल्या आण...