काही गोष्टी-ठिकाण अविरत दिमाखान स्वतःच वेगळपण टिकवून ठेवत असतात. बदलते हवामान, ऋतु , नक्षत्र, नैसर्गिक आपत्ती इ गोष्टीत सुद्धा त्या कणखर आणि अनुभवी तेजपुंज तपस्वी प्रमाणे मानेच शिखर उंच ठेवत असतात. आपण विचार करतोय तो बेलाग, अमर्याद निसर्ग संपत्ती, उंच उंच शिखर, काळ्या कातली निर्जन जागा, लांबच लांब पसरलेली रान आणि त्यांच्या पोटात कोळ्याच्या घरट्याप्रमाणे कोरलेल्या रानवाटा आणि कुठे एखादा जीरे टोप घालून त्यात मानाचा तुरा खोउन आपल वेगळेपण दर्शवणारा स्वराज्याचा साक्षीदार एखादा किल्ला-गड-दुर्ग. 'महाराष्ट्र हां दुर्गांचा देश आहे. दोन-चार डोंगर उतरून गेल की एखादा डोंगर डोक्याला तट-बुरुजांच शेले-पागोटे बांधून उभा असतो.' अस महान भटके-लेखक म्हणतात ते खरच. यातील अनेक दुर्गांनी शिवछत्रपतींच्या चरणाची धुळ सुद्धा आपल्या ललाटी फासली आहे. यांचे स्वातंत्र्य टिकवाया अनेक सह्यपुत्रांनी रक्ताचे सडे शिंपले आहेत त्यांच्या अद्भुत पराक्रमानी हां हां अखंड सह्याद्री आजही त्यांची थोरवी गातो...ती ऐकू येते..आजही..कधी घराबाहेर पावल नेउन पहा,या सह्याद्रित जा, फिरा आणि ऐका. आजही हां पुराणपुरुष त्यांच्या पर...