आपल्या महाराष्ट्रात यंदा मस्त तुफान धुमधडाक्यात पावसाल सुरु झाली. सुकलेले तलाव, नदी, नाले, ओढे, धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत.. कोरड्याशार निसर्गाचं रुपडं काही दिवसातच पालटून हिरवगार झालय.. सह्याद्रीतील अनेक सुप्रसिद्ध स्थळांना, गडकिल्ल्यांना भेटी देण्यासाठी दर शनिवार - रविवारी पर्यटकांची रेलचेल चालू झाली आहे. अशा हिरव्याशार निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी तरुणाई भटकंतीसाठी आपली पावले सह्याद्रीकडे वळवीत आहेत.. परंतु सद्यस्थितीत या वर्षी जोरदार पाऊस पडत असल्याने कसलीही पर्वा किंवा पूर्वनियोजन न करता याच तरुणाईचा अतिआत्मविश्वास सह्याद्रीतील अनेक ठिकाणी होणाऱ्या अपघातांना बळी पडत आहे.. आणि बहुतांशी अपघात किल्ल्यावर व त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणी होत आहेत असे दिसून येतेय. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी असे अपघात होत आहेत त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांना याचा त्रास सुरु झाला आहे. अपघातास बळी पडणारे जखमी होणारे जास्तीत-जास्त लोक हे अमली पदार्थाचे सेवन किंवा मद्यप्राशन करून आलेले दिसून येतात... डोंगर उतारावरील ओढे, नाले व धबधब्यांच्या ठिकाणी या घटना घडत असताना दिसत आहेत. आणि अशाच ठिकाणी पर्यटक...