गेल्या दोन वर्षापासून उत्तर कोकणातील किल्ल्यांनी मला भुरळच घातली आहे . डहाणूपासूनच वसईपर्यंतच अथांग समुद्रकिनारा लाभलेल्या या भागात जलदुर्गाप्रमानेच डोंगरी किल्ल्यांचीही सुमृद्धी लाभली आहे .या भागातील सर्वचा सर्व जलदुर्ग तशेच प्रेक्षणीय स्थळे भटकून सुरवात केली ती येथील डोंगरी किल्ल्यांच्या भेटीची.सर्वात आधी सुरवात केली ती वसईच्या कामणदुर्गापासून मग विरारच्या टकमक किल्ल्यापासून मग तांदूळवाडी, आशेरी,आणि स्वच्छता मोहिमे प्रसंगी बोईसरजवळील असावा किल्ल्याची .खरेतर प्रत्येक डोंगर भेटीत जुन्या नव्या मित्रांची साथ भेटत गेली. कारण उगीचच बोंबलत फिरायला आपल्या गाठीतला पठ्ठ्या प्रत्येकाला हवा असतोच . आतापर्यंत पाहिलेल्या सर्व गडकिल्ल्यांची तहान मित्रांसमवेत भागविण्यात वेगळीच मजा असते. वह "मेरेको इच मालूम है". तर विषय असा कि गेल्याच्या गेल्या आठवड्यात (म्हणजेच परवा आठवड्यात :P) विक्रांत पुन्हा समुद्रामध्ये मासे मारण्यासाठी जाणार अशी कानकून (कानावर नाही) वाट्स अप वरच्या ग्रुपवर लागली. आणि खर सांगतो हे वाचताच माझी अक्षरश : उदास झाली . "कसमे वादे निभायेंगे हम ",वादा करले साज...