या ३ दिवसाच्या प्रवासाची सुरुवात नक्की कशी व कुठून करावी हे आता लिहिताना सुचत नाहीये. ऑगस्टमध्ये झालेल्या पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती नंतर काही महिने? आराम करावा, आता घरादाराकड अन कामाकडं लक्ष द्यावं, दुनियादारी बंद करून संसाराला लागावं वैगेरे विचार येऊन गेला. त्यानुसार दोन महिने पूरेपूर प्रयत्न केला गेला. आज्याबात कुठंच गेलो नाही असं म्हणताना आज स्वतःलाच हसू येतंय. सप्टेंबर मध्ये प्रथमोपचार शिबीर सोडलं तर कुट्टच गेलो नव्हतो. मागच्या महिन्यातच बाकीच्या टाळक्यांचा दसऱ्या निमित्त यावर्षी मराठवाडा भागातील भुईकोट किल्ले भ्रमंतीचा प्लॅन ठरला होता. दसरा, रविवार आणि गांधीजींची जयंतीनिमित्त लागोपाठ आलेली सुट्टी, तीन दिवसाच्या प्रवासाच ठरलेलं नियोजन. महिनाभर आधी ठरलेल्या या ट्रेकला न जायचाच ठाम निर्णय घेतला होता. गेल्याच आठवड्यात धाडकन या निर्णयाचा इस्कोट झाला. शेवटच्या घडीला या ट्रेकला जायचच हा निर्णय अंमलात आणला. स्वतःसाठी वेळ काढत जमेल तसं मी सह्याद्रीत फिरतोय. आतापर्यंतच्या या प्रवासात मी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व कोकण पाहिलं होतं पण मराठवाडा परिसर आजवर पाहिल...