सुट्टीवर आल्यापासून दोन आठवडे घरचीच काम चालली होती. कुठ फारस बाहेर जायला मिळाल नाही. गावाहुन येताना वरंधा घाटान आलो न दुपारी हुक्की आली म्हणून कर्नाळा एवढाच काय ते फिरण. तस ही आठवडा सुट्टी साठी इतर भटक्यांचे प्लान तर नेहमीचेच होते. पाऊस ही तसा उघड उघड पडायला सुरवात झाली होती. याच वेळी कस काय ते मला दुर्बुद्धी सुचली न स्टेट्स टाकला. स्टेट्स टाकताच भूषणचा फोन आला म्हणला नाथ बाबा च्या गुहा करायच्या का..? मी ऐकल होत पण गेलो नाही कधी. म्हटल,' ठीक...ठरल'. कोणाला न सांगताच गाडी हाकली सकाळी. नेहमी प्रमाणे विसावा नाश्ता करायच ठरल पण भूषण म्हटला खोपोलीलाच करु डायरेक्ट. मग सुसाट खोपोली. नाश्ता वगेरे करुन बाईक जाते तिथवर घालायची या अटीवर झेनित च्या दिशेन गेलो. दोघ ही अवली-भटके. दत्ताच देऊळ आहे तीथवर गाडी गेली. गाडी तीथ लावून आम्ही वाटेचा विचार करत होतो. कारण दोघांना ही वाटेची ख़ास कल्पना नव्हती. मग एक पुजारी वजा गावकरी भेटला त्याला विचारल तर म्हणे," आत्ता जाणार..? चार बोगदे पार करावे लागतात.." आमच उत्तर," तूम्ही रस्ता सांगा, चार बोगदे न चार डोंगर आम्ही बघतो ...