सुट्टीवर आल्यापासून दोन आठवडे घरचीच काम चालली होती. कुठ फारस बाहेर जायला मिळाल नाही. गावाहुन येताना वरंधा घाटान आलो न दुपारी हुक्की आली म्हणून कर्नाळा एवढाच काय ते फिरण. तस ही आठवडा सुट्टी साठी इतर भटक्यांचे प्लान तर नेहमीचेच होते. पाऊस ही तसा उघड उघड पडायला सुरवात झाली होती. याच वेळी कस काय ते मला दुर्बुद्धी सुचली न स्टेट्स टाकला. स्टेट्स टाकताच भूषणचा फोन आला म्हणला नाथ बाबा च्या गुहा करायच्या का..? मी ऐकल होत पण गेलो नाही कधी. म्हटल,' ठीक...ठरल'.
कोणाला न सांगताच गाडी हाकली सकाळी.
नेहमी प्रमाणे विसावा नाश्ता करायच ठरल पण भूषण म्हटला खोपोलीलाच करु डायरेक्ट. मग सुसाट खोपोली. नाश्ता वगेरे करुन बाईक जाते तिथवर घालायची या अटीवर झेनित च्या दिशेन गेलो. दोघ ही अवली-भटके. दत्ताच देऊळ आहे तीथवर गाडी गेली. गाडी तीथ लावून आम्ही वाटेचा विचार करत होतो. कारण दोघांना ही वाटेची ख़ास कल्पना नव्हती. मग एक पुजारी वजा गावकरी भेटला त्याला विचारल तर म्हणे," आत्ता जाणार..? चार बोगदे पार करावे लागतात.."
आमच उत्तर," तूम्ही रस्ता सांगा, चार बोगदे न चार डोंगर आम्ही बघतो ". वाट घेतली मग चालु झाला रोमांचकारी सफ़र.
दत्ताच्या देवळाशेजारी डाव्याबाजूने वाट सरळ जाते ती डाव्याबाजूचे फाटे जातील तीच धरावी. मग मधी येणारे ओढ़े, घरंगळी वाट, ढोपरभर वाढलेल गवत, डोक्याच्या वर गेलेल्या करवंदीच्या जाळ्या सगळ तुड़वत ३०मी नंतर रॉक पैच लागतो. बरोबर ९० अंशाचे दोन टर्न आहेत. मध्ये मध्ये कोरीव पायर्या आहेत पण पावसाळ्यात पूर्ण शेवाळ असत. ग्रिप नसेल तर सरळ खाली. इथून पुढ गेल कि दोन वाटा आहेत एक उजव्या बाजुला जाते न एक डाव्या. उजवी वाट सरळ एका झाडीत जाऊन सुंदर अश्या धबधब्याजवळ जाते. आम्ही तीच निवडली. म्हणजे एक तास वाढीव. डावी वाट ज़रा वरती सरळच जाते. तीच खरी वाट आहे. आम्ही धबधब्याची मजा घेत आमचीच वाट काढत, क्लाइम्बिंग करत पठारावर आलो. मग समोर दिसतो रेल्वेचा पुल अन कोसळणारा सुरेख आणि वार्याच्या हिंदोळ्यावर खेळणारा धबधबा. डोंगराकडे तोंड केल कि मुंबईच्या बाजुला जायच आहे हे लक्षात ठेवायच. मग आम्ही वाट काढत, झाडी तुड़वत, दगडी चढत पुलावर पोहोचलो. हां एक पड़ाव. इथवर आमचा प्रवास झाला तीच खरी भटकंती. खुप अड़चणी आल्या, प्रसंगी नव्या रुजलेल्या गवाताने वाटा झाकल्या होत्या. शेवाळामुळे दगडी पैच निसरडते झाले होते. एवढीच काय ती तंगडतोड़. मग रेल्वे रुळावरुन मुंबईच्या दिशेन चालत जायच. चार बोगदे पार करायचे. पण बोगदे पार करताना येणार्या रेल्वे ची खबरदारी घेण खुपच गरजेच आहे. खुप पाऊस असेल तर निट आवाज सुद्धा येत नाही आणि अचानक रेलवे रुळावर तुम्ही जोरात पळू सुद्धा शकत नाही. म्हणून चार बोगदे पार करताना विशेष काळजी म्हणजे आवाजाचा अंदाज बांधने. रुळावरील कंपन आणि खुप लांबून येणारा हॉर्न चा आवाज यावरुन वेगाचा अंदाज बांधता आला पाहिजे आणि मग बाजुला जवळच असलेल्या वाढीव जागेत सुरक्षित जाऊन थांबणे.
चार बोगदे पार केल्यावर चौथा बोगदा संपेल तिथेच डाव्याबाजुला बोर्ड लावला आहे. त्याच दिशा दर्शकाने वरती चाल करावी. आम्ही चालत चालत वर गेलो ते एका छोटेखानी पठारावर. तिथून पुन्हा छोट्या खिंडित उतरायच. खंडित प्राजक्तिचा सडा पडला होता आणि सुगंध तर बेभानच होता.
खिंडीतुन वर जाताना पायर्या आहेत. वरती दगडात कोरीव गुहा आहे. शिवलिंग आहे. डाव्याबाजुला दगडात कोरलेली जुनी पण आत्ता शेंदुर फासलेली गणपती मूर्ती, वीणा हाती घेतलेली एक पूर्ण कोरीव प्रतिमा आणि तूटलेले दगड आहेत. शिवलिंग थोड आत आहे त्याबाजुला पाण्याच टाक आहे.
आत्ता गुहा ही पूर्ण रेलिंग लावून बंदिस्त केली आहे. तिथे पुजारी असेल तरच उघडी असते. इतिहास फार नाही माहीत तिथे कोणाला पण पांडवकालीन आहे अस म्हणतात तसा काय पुरावा नाही सापडला. तिथे कोणी नाथ बाबा नावाचे रहायचे म्हणून नाथबाबा ची गुहा. येतानाचा प्रवास खुपच रोमांचक झाला कारण पाउस आणि पुन्हा घसरडी वाट. मग काय पुल स्लाइड करत आलो खाली.
भटकंती उगाच भटकायच म्हणून नसते तर खुप काही शिकवून जाते. एरव्ही मळलेल्या वाटा पावसात तुम्हाला सगळ रान-डोंगर कसा फ़िरवतात याचा ख़ास अनुभव आला. एक भटका दुसर्या भटक्याच्या कामी कसा येतो. भटक्यांची एकच जात असते ती म्हणजे ' भटकी ' आणि त्यांचा देश ही एकच असतो तो म्हणजे हां अफाट ' सह्याद्री '. डोंबीवलीच्या 'पाऊल ट्रेकर्स' च्या ओळखी झाल्या. त्याचे खुप खुप धन्यवाद. त्यांनी फळ न बिस्किट-चिवडा असा फराळ आम्हाला दिला. पुन्हा भेटू असा आम्ही सुद्धा वादा केला आणि परतीचा प्रवास सुकर केला.
माझी भटकंती ही अशीच असते ना कधी नियोजन ना कधी पूर्व तय्यारी. फ़क्त मनात आल की निघालो. एक पारले जी आणि एक पाण्याची बाटली बस्स एवढाच संसार बाकी कोण येवो अगर न येवो.
दुर्गमित्र पनवेल चा हुन्नरी भटका भूषण असबे चे आभार मानणार नाही पण नव्या जागे साठी थ्रिल आणल्या बद्दल थैंक्स मित्रा.
पुन्हा एकदा सुहास, रुपेश, बापू आणि विठ्ठल तुम्हाला मिस्स केल. अचानक ठरल म्हणून माफ़ करा.
-दर्यासारंग
Comments
Post a Comment