घाटवाटांची चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण. दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्य...
अप्पर सीटवर जागा मिळाली रुप्याचा MP3 घेऊन गाणी ऐकत कधी झोप लागली अन कधी सोलापूर आले कळलंच नाही. स्टेशनबाहेर असलेल्या प्रसिद्ध "अमृततुल्य" चा चहा पियालो. आज दसरा होता गडवाट परिवाराकडून परांडा किल्ल्यावर आज तोरण बांधले जाणार होते ... जुना गडवाटकरी मित्र सुदर्शन हारफूले घेऊन हजर झाला बऱ्याच वर्षांनी गळाभेट झाली. दोन्ही गाड्या आल्या.. बॅगा ठेवून जागा पकडल्या.. तिथूनच पुढे एका उडप्याच्या हॉटेलात आमचा पोटभर नाश्ता झाला. सुदर्शनला निरोप देताना काढलेला ग्रुप फोटो सोलापूर येथील संभाजी महाराज चौकात सुदर्शनला निरोप दिला आणि भटक्यांच्या दसऱ्याला इथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. गाडी हायवेला लागली तशी पोर रानवारा पिऊन तरतरीत झाली होती. आमच्या गाडीत मी, मोठा अमर, सुबोध, रुपेश, सुरज, जयेश आणि किशोर अशी टीम होती तर बाकीची दुसऱ्या गाडीत. दोन्ही गाडीत धमाल मस्ती सुरु झाली. वैराग येथे दोन मित्रांची सोबत झाली आणि इथला फक्कड चहा झाला. आता पुढील लक्ष होते बार्शीतील प्राचीन भगवंत मंदिर .. सोलापूर ते बार्शी ७० किमी असे दीड तासाचे अंतर आहे. १०:३० वाजता आम्ही भगवंत मंदिरात पोचलो. विष्णू...