Skip to main content

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू - विलास दादा - मी - रूपेश आणि सुहास
सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प

अमरावती जिल्ह्यातील सातपुड्यातलं मेळघाट अरण्य त्यापैकी एक आहे. डोंगरटेकड्यांतील घाटांचा संगम (मेळ) या अरण्यात झाला आहे. म्हणून ‘मेळघाट’ हे नाव या अरण्याने धारण केले आहे. मेळघाटला प्राचीन-अर्वाचीन व नैसर्गिक इतिहास आहे. पांडवांनी आपला अज्ञातवास याच अरण्यात घालविला.विराटाचं विराट नगर याच अरण्यात होतं. दुष्ट कीचकाला भीमानं मेळघाटातच यमसदनास पाठविले. विराटचा अपभ्रंश होवून बनलेलं वैराट नावाचं गाव आजही मेळघाटात आहे. किचकाच्या नावावरून निर्माण झालेलं चिखलदरा हे ठिकाण उंच टेकडीवर वसलेले आहे. दिल्लीतील मोगल बादशहाच्या पलटणी दक्षिणेवर स्वारी करण्यासाठी मेळघाट अरण्यातून पुढे जात असत. अरण्यवासी गोवारी गवळी जमातीच्या राजाचा गाविलगड हा किल्ला मेळघाट अरण्यात आदिवासींच्या साम्राजाची साक्ष देत आहे. अशी सर्व माहिती मिळविल्यानंतर कधी एकदा या स्वर्गानुभूतीत पोहचतो असे झाले होते....आणि शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प Melghat Tiger Reserve या program मध्ये भाग घेण्यासाठी मी सज्ज झालो. तसा हा program नव्हताच.....हि तर संधी होती माझ्यासाठी निसर्ग वैभवाच्या काळजात जावून माझे मन तृत्प्त करण्याची.....मग याची उत्सुकताच मनाला प्रेरणा देत होती. माझ्यासोबत सुहास, विलास दादा, रूपेश व बापू असा ५ जणांचा लवाजमा होता. नियोजनाप्रमाणे सर्वकाही वेळेवर होत होतं. मुंबईहून मग जवळ-जवळ ६०० किमीचा प्रवास करून आम्ही camp च्या ठिकाणी पोहोचलो. पोहचण्या अगोदर मेळघाट भटकंतीविषयी एक चित्र मनात रंगवले होते. परंतु आपल्या अनुभवातून RangeOfficer रणजीत गायकवाड यांनी वेगळेच रंग भरले. आम्ही सर्व एकत्र राहून patrolling करणार हा विचारच त्यांनी मोडीत काढला. आम्हाला २ गटांत विभागण्यात आलं.....अपेक्षित नव्हतं पण तसं करावं लागणार होतं
१- विलास दादा आणि सुहास
२- बापू, रूपेश आणि मी.


मेळघाटात फिरणे किंवा आपल्या निसर्गानुभवात भर घालत असताना जी patrolling करावी लागणार होती, त्याविषयीची सर्व खबरदारी व माहिती आम्हास देण्यात आली. या Patrolling Program चा मुळ उद्देश जंगलतोडीला आळा बसावा.... तसेच वाघाची व इतर कोणत्याही प्राण्याची शिकार होऊ नये हाच होता. सोबतच जंगलात असणाऱ्या पशु-पक्षांच्या जाती-प्रजाती यांची माहितीसुद्धा या program द्वारे update करता येणार होती. मेळघाटात जंगली अस्वलांची संख्या फार असल्याने त्यांच्यापासून योग्य ती खबरदारी घ्यावी अशा instructions देण्यात आल्या. तसे अस्वल वाघ, बिबळ्या व रानकुत्र्यासारखं शिकारी वृत्तीचं नाही. माणसाला ते घाबरते. माणसापासून दूर पळते. परंतु असे असतानाही अरण्यात अस्वलांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडलेल्या असल्याने खबरदारी घेणे आवश्यक होते. उन्हाळ्यात मोहाची फुलं फुलतात. हि फुले खायला अस्वल भल्या पहाटे निघतं. त्याचवेळी मेळघाटातले आदिवासी फुले गोळा करायला जातात. अस्वलांची व त्यांची गाठ पडते. अस्वलांना आदिवासी हुसकावण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी चिडून ते माणसावर हल्ला करते. या योगायोगाने अस्वलाशी झालेल्या भेटीतून अस्वलाने केलेल्या हल्ल्याचे अपघात येथे घडतात. भीतीपोटी ते हल्ल्यास प्रवृत्त होते. माणसं आपली चूक न सांगता सारा दोष अस्वलावर ढकलतात. अशी माहिती आम्हाला देण्यात आली. आठवडाभराचा शिधा आम्ही घेऊन आलो होतो. तो विभागुन मग आम्ही आमच्या camp च्या दिशेने निघालो. मेळघाटाची प्रगल्भता आम्हाला हळू-हळू लक्षात येत होती. Forest विभागाच्या त्या गाडीतून आम्हाला आमच्या respective camp पर्यंत सोडण्यात आले. ‘माडीझडप’ नावाच्या camp मध्ये आमची व्यवस्था करण्यात आली होती. Camp पर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला एक नदी पार करावी लागणार होती. ती पार केल्यानंतर एका मध्यम उंचीच्या टेकडीवर आम्हाला एक राहण्याची जागा दिसुन आली. ज्या झोपडीत आम्ही राहणार होतो ती अतिशय सुंदररित्या बांधण्यात आली होती. निसर्गाच्या हृदयात असणारी ती झोपडी आम्हाला स्वर्गानुभव देण्यासाठी नटलेली होती. रात्रीच्या वेळी जंगलातील प्राण्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी झोपण्याची जागा जमिनीपासून १५-२० फुट उंचीवर ठेवण्यात आली होती. प्रत्येक camp मध्ये किमान २ माणसांची नेमणूक करण्यात आली होती. एकाची जबाबदारी रोज गस्त घालण्याची तर दुसऱ्याची camp मध्ये राहून आसपासच्या हालचाली नमूद करण्याची. एकमेकांशी आम्ही ओळख करून घेतली पण संध्याकाळ झाल्याने त्या दिवशी काही गस्त घालता आली नाही. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी ६ वाजता आम्ही गस्तीकरता निघालो. माडीझडप camp हा महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमारेषेलगतचा दुर्गम डोंगराळ भाग आहे. आमच्या camp चा परिसर जवळ-जवळ ८-१० km मध्ये पसरलेला आहे. पहिल्या दिवशी आम्ही नदीच्या पात्रातुन गस्त घालण्याचे ठरविले. पहिल्याच दिवशी आम्हाला वाघाच्या पायाचे ठसे बघायला मिळाले. त्याच्या ठशांचे मोजमाप केल्यानंतर ते जनावर किती भव्य असेल याचा अंदाच बांधला.


व्याघ्रसौंदर्याची जाण यातून काही प्रमाणात झाली. मेळघाटात वनवृक्ष, वन्यप्राणी, पक्षी, जलचर, उभयचर व अगणित छोट्या-मोठ्या जीवांची सोबत आम्हाला लाभत होती. सोबत आणलेल्या camera मध्ये ते टिपण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. आंबा, पळस, साग, पिंपरी, मोह, तेंदू, काऊ, कुंभी, हळदू या वनराजीची सुरम्यता मनात आणि क्यामि-यात साठवताना कसरत करावी लागत होती. वृक्षराजीवर वानरं आणि टकाचोर सारख्या पक्ष्यांच्या क्रीडा पाहायला मिळत होत्या. या हिरव्या मार्गावरून चालताना क्षणिक आम्ही आमचे मन मेळघाटमय करून टाकले होते. त्यात मधाचा गोड सुगंध अधिकच दरवळत असल्याने मन तृप्त होत होते. अंजनाच्या झाडावर व खोडाच्या तळातील बिळात मधमाशांची पोळी असतात. त्यातील मधाचा हा सुगंध जगण्याच्या पलीकडचा आनंद आमच्यावर ओवाळून टाकणारा हा प्रदेश भाव खावून जात होता. नदीचे पात्र ज्या ठिकाणी रुंदावते त्या जागी आम्ही आलो होतो. एका मोठ्या जनावराच्या हाडांचे अवशेष तिथे पडले होते. गस्त घालत असताना गस्तीचा मुळ उद्देश न विसरता बारकाईने सगळीकडे लक्ष देत होतो. तसेच वेळोवेळी आवश्यक ती माहिती लिहून घेत होतो. बाघ किंवा बिबळ्या पाहण्याचा ध्यास मनाला लागलेला असताना इतर वन्यजीव मग यात ससे, सांबरचितळाची पाडसं, नीलगाय, मुंगुस, चौशिंगा, तरस, ऊदमांजर, भेकर, तृणहरीण, वाघटी मांजर, कोल्हे, मोर, रान कोंबड्या आदी वन्यजीव पाहताना भान हरपून जात होते. पक्ष्यांचं गूढरम्य विश्व मेळघाटात प्रत्यक्ष जगत असताना सर्पगरुड, मत्स्यगरुड, नागांत गरुड, श्वेतनयन गरुड, सुपर्ण गरुड, कृष्ण गरुड, बहिरी ससाणा, शाहीन ससाणा, नागरी घार, सागरी घार, गव्हाणी घुबड, शृंगी घुबड, मत्स्य घुबड, तपकिरी रानघुबड, रानपिंगळा, गिधाड, तितर, चकोत्री, पाकोर, हरियाल, कवडा, लाल होला, पहाडी, पोपट, टूईया, कोकीळ,चातक, पावश्या, भारद्वाज, रातवा, धनेश, तांबट, सोनपाठी सुतार, नीळकंठ, रानकावळा, नवरंग, चंडोल, भिंग-या, पाकोळ्या, वेडेराघू, भृंगराज, खाटिक, पहाडी मैना, पोपई मैना, हुडी मैना, गुलाबी मैना, दयाळ, बुलबुल, स्वर्गीय नर्तक, विस्फुलिंग, रानसातभाई, नीलिमा, वटवट्या, शिंपी, भारीट, कस्तूर, गोसावी, गप्पीदास, खोडपक्षी, चष्मेवाला, सुगरण, पटेरी सुगरण, रानचिमण्या, मुनिया, सूर्यपक्षी, धोबी, फुलटोचा, टकाचोर, गुलाबी चटक यांची साथ निसर्गमैफिल अधिक बहारदार करत होती. सुर्य डोक्यावर आला होता तसा आम्ही परतीचा मार्ग धरला आणि मग आमचा camp गाठला. स्वावलंबीपणा जपण्यासाठी आम्ही आमचं जेवण स्वतः बनविण्याचे ठरविले होते. जेवण करून मग camp परिसरात फेरफटका मारला. काहीवेळाने पुन्हा आम्ही गस्त घालण्यास निघालो. वेळेनुसार जंगलातील वातावरणात तसेच प्राणीमात्रांचे आवाज हालचालीही बदलत होत्या. पाण्याची कमतरता नसल्याने जनावरांचे दर्शन तसे दुर्मिळ होते. मेळघाटात कोळ्याचे अनेक प्रकार बघायला मिळाले. नाना प्रकारचे खेकडेही पाहायला मिळाले.


मेळघाट प्रकल्पामुळे आमचा तिथल्या आदिवासी जमातीसोबत संबंध आला. त्यांच्या सोबत केलेल्या चर्चेतून आणि प्रत्यक्ष निरीक्षणातून येथील औषधी वनस्पतींचीही ओळख आम्हाला झाली. कळलावी, रानहळद, रानकेळ, कपाळकोडी, पुनर्नवा, शंखपुष्पी, शतावरी, मंदार, कंबरमोडी, शिवलिंगी, जंगली मोगरा, काळाकुडा, दहीपळस, भुमका, गोक्षर, पुष्पवंती, बिब्बा, इंद्रवंती, दगडफोडी, करडू, रानकांदा, रानतुळस, हंसराज, सफेदमुसळी, दुधकंद, आघाडा, निवडुंग, गणेशपुष्प, चेरडी, जंगली तीळ, पिंगवेल, भारंगी, लाल गुंज, रान कापूस या औषधी वनस्पती अनुभविन्याचा योग याची देही याची डोळा आल्याने मी सातवे आसमानपर होतो. औषधी वनस्पतींसोबतच साग, धावडा, तिवस, लेंडीया, आवळा, धामण, सालई, केकडा, कळम, घाटबोर, मोह, मोखा, होम्बा, आंबा, बिलवा, वड, जांभूळ, अमलताश, कुंभी, अर्जुन, उंबर, पांगारा, रोहन, बेहडा, धोबन, तेंदू, हिरा, बीजा, सावर, भोकर, काहु, कोसाई, बेल, घुशी, कुसुम, मुरुडसेंग, भंडार, निरगुडी, करसाली, रानभेंडी, भारती, खरसी, बोर आदी वृक्ष व कावडवेल, पळसवेल, महुल, चिलाटी, खाजकुयरी आदी वेली आहेत.


मेळघाटात निसर्ग सौंदर्य मनात साठवत असताना येथील आदिवासी जीवनशैली मनात एक वेगळे स्थान निर्माण करत होती. एकविसावे शतक उजाडले तरी मेळघाटातील अनेक आदिवासी गावांत वीज पोहोचलेली नाही. कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्यतज्ज्ञ नाहीत. आदिवासी शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी कोणत्याच स्तरावर प्रयत्न केले जात नाहीत अशा अनेक समस्या माझ्या मनात अस्वस्थता निर्माण करत होत्या. मेळघाटातील आदिवासी बांधवांचा मुख्य व्यवसाय शेती व शेतमजुरी आहे. या भागाची कृषी क्षेत्रात फारसी प्रगती झाली नसल्याने तिथे बारमाही उद्योगधंदे उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील शेतमजुरांना कायमस्वरूपी काम मिळण्यासाठी सारखी धडपड करावी लागते.बहुतांशी लोकांना ७ ते ८ महिने कामच नसते. पावसाच्या पाण्यावर जे पीक येईल त्यावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जगण्याची स्पर्धा तशी कठीणच आहे. ज्या भागात जंगल आहे त्या भागात काही कुटुंबे डिंक, मोहाची फुले, टोळंबी, चारोळी, करवंदे,इ. वनौपजे गोळा करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यामुळे जगण्याची एक कसरत येथील आदिवासी माणसामध्ये आपणास दिसून येते. परंतु असे असतानाही मनाची श्रीमंती मात्र ठासून भरल्याचा अनुभवही आम्हास येत होता.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा विचार केला तर आज येथे अनेक मानवी समस्या प्रत्यक्ष पहावयास मिळतात. या व्याघ्र प्रकल्पात अजून ५९ वनगावं आहेत. या वनगावांनी या प्रकल्पातील ७५०० हेक्टर अरण्य व्यापलेले आहे. या गावांमध्ये कोरकू, बलई, गोंड, निहाल गवळी या आदिवासी जमाती राहतात. आपल्या उदरनिर्वाहासाठी पशुपालन व्यवसाय या जमाती करतात. यांची सारी गुरं या प्रकल्पात चरतात. गवा, सांबर, चितळ यांच्या उंचीवरचा हिरवा झाडपाला तोडून गुराखी गुरांना घालतात.त्यामुळे मेळघाट अरण्यातील तृणभक्षी वन्य जीवांना उपाशी राहावं लागतं. ठरवून दिलेले क्षेत्र सोडून आदिवासींची गुरं संरक्षित क्षेत्रात चरताना सापडली तर वनकर्मचारी त्यांना पकडून कोंडवाड्यात घालतात. परंतु आदिवासींच्या नावावर राजकारण व स्वार्थ साधणारे पुढारी त्याचा गैरप्रचार करतात. आदिवासींवर अन्याय झाल्याची आवई उठवतात. यामुळे वनकर्मचा-यास मारहाणही केली जाते. त्यातून आदिवासी आणि वनकर्मचारी यांच्यामधील संघर्ष अधिक वाढीस लागत आहे.

मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पातील ५९ वनगावांत कोरकू आदिवासींची संख्या अधिक आहे. यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेती पावासाळी आहे. शेतीत ज्वारी, मुग, नाचणी, तूर, बरबटी, कुटकी हि पावसाळी पिके घेतली जातात.चार महिनेच शेतात काम असते. आठ महिने मजुरी केली जाते. वनखात्यांत रोजंदारीवर काम करतात. जंगलातील मध, चारोळी, तेंदूपत्ता, मोहाची फुले गोळा करतात. ते विकून पॉट भरतात. सावकाराच्या कर्जात ते सतत बुडालेले असतात. त्याचं अव्वाच्या सव्वा व्याज फेडण्यात त्यांचा जन्म जातो. यामुळे सतत दारिद्र्यात खितपत पडलेले असतात. तरी ते आनंदी असतात. स्वताला निसर्ग पूजक समजतात. कोरकू शिवभक्त आहेत. रावण जगश्रेष्ठ शिवभक्त होता म्हणून ते रावणाची पूजा करतात.
कोरकू आदिवासी कोरकू भाषा बोलतात. कोरकू म्हणजे जंगलात कळपाने राहणारे मनुष्यप्राणी. कोरकू रंगाने काळा आहे. गोल चेहरा, मध्यम उंचीचा असतो. पुरुष गुढघ्यापर्यंत धोतर व तोकडी बंडी घालतो. डोक्याला धडपा गुंडाळतो. स्त्रिया रुंद काठाचं गोल सुती लुगडं नेसतात. डोक्याला पदर गुंडाळतात. कोरकू लोकं अनेक सण साजरे करतात. शृंगार करून मोहाचे मद्य पितात. त्या धुंदीत नाचतात, गातात. होळी, वरुणदेवाचा उत्सव, दसरा इत्यादी सणांना अधिक महत्त्व देतात. आकाशाला देवाचा मांडव मानून त्याखाली डोक्यात मोरपिसं लावून निसर्गगीत गात नाचतात.

आपल्याला शुध्द जल-वायू मोफत पुरविणारे हे नैसर्गिक कारखाने सुरक्षित ठेवण्यासाठी आदिवासींचे योग्य पुनरवसन करणे अपेक्षित आहे. आदिवासींची अरण्यसंस्कृती जोपासणे अत्यावश्यक आहे. आदिवासी विकासाच्या स्वार्थी व भंपक योजना न राबविता आदिवासींचे अस्तित्व जपण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. यातच सर्वांचं कल्याण आहे.


 

 

Comments

  1. फारच छान... मेळघाट tiger Reserve ला भेट देण्यासाठी योग्य वेळ कुठली ??? आणि volunteer म्हणून जायचे असल्यास कोणाशी संपर्क साधायचा ??? निसर्गाच्या या रानात सर्वांनी एकदा तरी भटकायलाच हवं...

    ReplyDelete
    Replies
    1. Urjit Barve : Tasa kadhi pan jau shakato pan April May best aahe.. Volunteer mhanun jayacha asel tar teychya web site var purn Mahiti aahe..

      Delete
    2. okies... website chi link kay aahe ???

      Delete
    3. urjit patrolling sathi jaychi ichha asel tar varshatle 12 mahine apan jau shakto ..........fakt janya aadhi tyamchya shi contact karun registration karava lagta.

      Wildlife Research and Conservation Society
      1A, Shriyog Society
      127/3, Sus Road, Pashan
      Pune-411021
      Maharashtra
      India
      Office:+9120-65222903/25871310 (f)
      Email:mail@wrcsindia.org,

      Delete
  2. खुप छान आवडले

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

शिवकालीन लिंगाणा - भाग १

भटकंतीचा भस्म्या लागलेल्याला आपली भटकायची भूक भागवण्याकरिता एखांद्या मुहुर्ताची गरज नसती. समोर आलेल्या हिंडायच्या प्रस्तावाप्रमाणं सारं काही manage करणं त्याला आपसुकच जमत असतं. माझ्या बाबतीत सांगायच तर २०१४ मध्ये अगदी  action trekking shoes फाटुस्तोवर फिरलो. घराकडं साहजिकच कमी लक्ष दिलं गेलं. म्हणून मग ठरिवलं या वर्षी जरा समतोल राखायचा आणि घराकडं जरा जास्त लक्ष द्यायचं. पण ते काय हाय समोरून जशी एखांदी सुंदर मुलगी जात असली तर कितीही पण केलेल्या माणसाचं तिच्याकडे आपोआपच लक्ष वेधलं जातं अगदी तसच एखाद्या भटक्याच लक्ष त्याच्या डोळ्यासमोर plan होत असणार्या भटकंतीकडं आपोआपच वेधलं जातं. २०१५ सुरू झालं होतं. समोरून लय प्रस्ताव येत होते. पण कसाबसा स्वत: ला आवरून मोह टाळला होता. जानेवारी संपायच्या मार्गावर होता. महिनाभर कुठं भटकायला न गल्यानं घरातले तसे खुष होते मात्र जवळच्या मित्रांचे टोमणे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. २४,२५,२६ तीन दिवस सुट्टी जोडून आल्यानं मनाची चलबिचल सुरू झाली होती. whatsapp वर सर्वांचे message यायला सुरवात झाली होती. "कुठं जाणार असशीला तर कळीव लेका", असे बरेचसे mes...