Skip to main content

निसर्गाशी ऋणानुबंध

दिवसागणिक दिवस जात असतात. काम, घराच्या जबाबदाऱ्या आणि काही कर्तव्य यातून फारसा वेळ मिळतच नसतो. त्यात सगळच वेळेवर होत अस नाही म्हणजे आमच्या आयुष्यात कधी झालच नाही. पण म्हणून निराश होण हे शेवटच कारण नाही. निराश कधी झालोच नाही. कधी थांबलोच नाही. कधी मागे फिरुन पाहिलच नाही. जे आहे त्यांना घेऊन चालत राहिलो, पडत राहिलो, धडपडत राहिलो, प्रसिद्ध नाही झालो, पण सिद्ध झालो. तो या भटकंती मुळेच.

निसर्गाशी असलेला रुणानुबंध आणि रक्तातील तेज जागवुन ठेवण्यासाठी भटकंती शिवाय दूसरा पर्यायच असू शकत नाही. स्वावलंबन, आत्मविश्वास, साहस, जिद्द, बंधुभाव, समजुतदारपणा, तडजोड, ध्येयासक्ती, निसर्गप्रेम, प्रसंगावधान, संकटांशी मुकाबला एवढं सगळ कमवल ते या सारासार प्रपंचातुन. कधी स्पर्धा केली नाही पण म्हणून आव्हान उडवली सुद्धा नाहीत. ती पुरेपूर पेलुन धरली. वेळेच बंधन तर नव्हतच आणि आर्थिक अडचण ही भासली नाही, तशी भासूच दिली नाही कारण ' शेजाऱ्याच पोर पाजाऱ्याकड़े ठेऊन शौक करण ' आमच्या हिशोबात नसत. 


या निसर्गान अर्थात सह्याद्रीन त्याच्या अष्टपैलू सौंदर्यान मोह घातला आहे तो सुटने शक्य नाही. निसर्गाच रौद्ररूप, अक्राळविक्राळपणा, कधी भीषण वादळवाऱ्यांची व धुंवादार पावसाची गाज, वैराण भगभगित उन्हाचे चटके, कातळ-दऱ्या-सुळक्यांमधून आपल पिळदार, राकट पुरुषी सौंदर्य दाखवतो तर दुसरीकडे सूर्यास्ताच्या रंगबिरंगी छटांच मनोहरी दर्शन, मोकळ्या पाठीवर सोडलेल्या लता-वेली-झऱ्यांमधून जंगली हिरवाईच तारुण्य दाखवतो.



या छंदामुळे निसर्गाच्या निकोप निरोगी, विराट-बेलाग रुपाच एवढं दर्शन घडत की सगळा अहंकार, आढ़यता सार काही त्याच्या समोर गळून पडत. अस म्हणतात की या उत्तुंग आणि ऊंची पुढे आपल खुजेपण दिसत. ही ऊँची दाखवून देते. पण तरीही कौतुक याच आहे की या सर्वांवर मात करण्याची ईर्षा...!! आणि याच इर्शेतुनच जन्माला आला आहे हां भटकंतीचा-गिरीभ्रमणाचा छंद. आणि याच आता व्यसन लागलय आणि आई म्हणायची, " घेतलेला श्वास आणि लागलेल व्यसन मेल्याशिवाय सुटत नाही आणि जे सुटत ते व्यसन नाही...!!!"






Comments

Popular posts from this blog

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

शिवकालीन लिंगाणा - भाग १

भटकंतीचा भस्म्या लागलेल्याला आपली भटकायची भूक भागवण्याकरिता एखांद्या मुहुर्ताची गरज नसती. समोर आलेल्या हिंडायच्या प्रस्तावाप्रमाणं सारं काही manage करणं त्याला आपसुकच जमत असतं. माझ्या बाबतीत सांगायच तर २०१४ मध्ये अगदी  action trekking shoes फाटुस्तोवर फिरलो. घराकडं साहजिकच कमी लक्ष दिलं गेलं. म्हणून मग ठरिवलं या वर्षी जरा समतोल राखायचा आणि घराकडं जरा जास्त लक्ष द्यायचं. पण ते काय हाय समोरून जशी एखांदी सुंदर मुलगी जात असली तर कितीही पण केलेल्या माणसाचं तिच्याकडे आपोआपच लक्ष वेधलं जातं अगदी तसच एखाद्या भटक्याच लक्ष त्याच्या डोळ्यासमोर plan होत असणार्या भटकंतीकडं आपोआपच वेधलं जातं. २०१५ सुरू झालं होतं. समोरून लय प्रस्ताव येत होते. पण कसाबसा स्वत: ला आवरून मोह टाळला होता. जानेवारी संपायच्या मार्गावर होता. महिनाभर कुठं भटकायला न गल्यानं घरातले तसे खुष होते मात्र जवळच्या मित्रांचे टोमणे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. २४,२५,२६ तीन दिवस सुट्टी जोडून आल्यानं मनाची चलबिचल सुरू झाली होती. whatsapp वर सर्वांचे message यायला सुरवात झाली होती. "कुठं जाणार असशीला तर कळीव लेका", असे बरेचसे mes...