Skip to main content

माझ्यासारखे खुपजण नव्या वर्ष्याच्या सुरुवातीस काही न काही संकल्प करत असतात. त्यातील काहींचाच संकल्प पूर्ण होतो आणि उरलेल्यांच्या यादीत माझ्यासारखे भरपूर भेटतील..
याही वर्षी २० ते २५ नवीन गडकिल्ले, धारातीर्थे आणि धार्मिक स्थळांना भेट देण्याचा संकल्प केला होता पण तो पुन्हा अयशस्वी ठरला.
परंतु ह्या भटक्याची भटकंती थांबली नाही. ह्या वर्षी सर्वात चांगली गोष्ट अशी घडली कि गडवाट सारखा गडदुर्गांची ओढ असलेला परिवार मिळाला. अगोदर कोणत्याही ट्रेकिंग ग्रुपसोबत किल्ले फिरायचो किंवा मित्रांसोबत जायचो. आता हक्काचा परिवार मिळाला ज्यातून गडभ्रमंती सोबत समाजकार्याची ओढ लागली. . असो.
ह्यावर्षी किल्ल्यांमध्ये वासोटा किल्ला , धारातीर्थांमध्ये तुळापुर (५वेळा) आणि धार्मिक स्थळांमध्ये शेगाव या नवीन ठिकाणाची भटकंती झाली तर या आधी पाहिलेल्या किल्ल्यांवर पुन्हा भटकंती केली.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सह्याद्रीतील गडकिल्ले त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत अजूनही तग धरून उभे आहेत.
मी गडकिल्ल्यांवर का फिरतो हे मलाच न उलगडलेले कोडे आहे. अजूनही आठवतंय ३१ डिसेंबर २००४ साली कॉलेजला बंक मारून आम्ही काही मित्र मलंगगडला गेलो होतो. तेव्हापासून हि भटकंती सुरूच आहे.
आता ३१ डिसेंबर २०१२ रोजी माझ्या भटकंतीची ९ वर्षे पूर्ण होतील.
गेल्या ९ वर्षात खूप चांगले वाईट अनुभव आले. नवनवीन सह्यामित्रांची ओळख झाली. गावागावातून फिरताना तिथल्या परिस्थितीची जान आली. आदिवासी पाड्यात राहताना भीती काय असते आणि दारिद्र्य काय असते हे जवळून अनुभवायला मिळाले. ह्या सह्याद्रीचे वेगवेगळे रांगडे रूप प्रत्येक ऋतूत पहावयास मिळते  कधी हिरवागार शालू पांघरून, कधी मखमली साज चढवून तर कधी सोन्यासारखा शृंगार करून. पावसाळ्यात धो धो पडणारा पाऊस, हिवाळ्यात कडकडून वाजणारी थंडी आणि उन्हाळ्यात अंगावर बसणारे चटके कसे असतात हे सह्याद्रीकडून अनुभविले.
जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि स्वावलंबीपणा सह्याद्रीमुळेच शिकायला मिळाला. Management कसे केले पाहिजे ह्याचाहि अनुभव सह्याद्रीने दिला.  हा सह्याद्रीचा प्रवास यापुढेही असाच चालू राहणार. नवनवीन गडकिल्ले पादाक्रांत करणे हाच माझा छंद राहील.
ह्या भटकंती मागे माझ्या ईश्वरसम आई वडिलांची साथ खूपच मोलाची आहे .
मी आभारी आहे ह्या सह्याद्रीचा जो त्याच्या अंगाखांद्यावर मनसोक्त बागडू देतोय. माझा प्रत्येक तोल सावरतोय. ज्याने त्याच्या उदरात वसलेल्या गडकिल्ल्यांचे वेड लावलय..
मी आभारी आहे माझ्या काही जुन्या तसेच नवीन मित्रांचा ज्यांच्यामुळे हा छंद जोपासण्यासाठी मदत होते आहे.
"हा सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच रौद्र हि आहे.
तो आधीच जाणीव करून देतो.
काय करायचं काय नाही करायचं त्याची
शेवटी तो माझा गुरु आहे"

या ब्लॉगमार्फत माझी भटकंती तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करतो आहे. जेणेकरून लोकांना गड-किल्ल्यांची आणि सह्याद्रीची आवड निर्माण होईल.
माझ्या काही नव्या व जुन्या भटकंती सहित लवकरच येईल.

Comments

Popular posts from this blog

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

ऐतिहासिक कुरवंडा घाटाची चढाई

  घाटवाटांची   चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण.  दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्य...