Skip to main content

तोरणा ते राजगड प्रवास सह्याद्रीचा भाग -४


तोरणा गडाहून सकाळी ९ वाजता निघालेली आम्हा ४४ जनांची फौज आता संजीवनी माचीखाली येवून बिलगली होती. संजीवनी माचीचा भव्य बुरुज खालून विलक्षण दिसत होता. व त्यावरील भगवा ध्वजामुळे त्याला वेगळाच साज चढला होता. पुणे मुंबईहून आम्हास थेट राजगडावर भेटायला आलेले वैभव धोपट , जयदीपराव, नितीश, महेश दादा, शेखर आणि संदीप दादा माचीवरून मोठ मोठ्याने हाक मारत होते. ह्यांची वरूनच थट्टा मस्करी चालू झाली होती. चालून चालून थकलेलो आम्ही आता पुन्हा ताजेतवाने झालो होतो. मोठ्या बापूला चांगलाच चेव आला होता. हे गडी सगळ्यात पुढे होते (त्यांचे प्रिय मित्र संदीप दादा आले होते ना.. कधी भेटतोय अस झाल असाव).
संजीवनी माचीला वळसा मारून आम्ही उजव्या बाजूने अळू दरवाज्याकडे निघालो. घड्याळात ३.३० वाजले होते. सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. काहींच्या पाण्याच्या बाटल्या रिकाम्या झाल्याने खूप तहानही लागली होती. जवळ पास साडे सहा तास आम्ही मंडळी चालतच होतो. आता अळू दरवाजा दिसू लागला होता. काही जन पोहोचले पण होते. काही जनांची चाल धीमी झाली होती ते सावकाश येत होते. थोड्याच वेळात आम्ही अळू दरवाज्याच्या उंबरठ्यावर येवून पोहोचलो. दरवाजा न्याहाळला आणि वेळ कमी होता म्हणून लगोलग संजीवनी माचीकडे वळलो. महाराजांच्या देखरेखीखाली केलेले संजीवनी माचीचे बांधकाम पाहण्याजोगे आहे. माचीची दुहेरी तटबंदी मोहून टाकते. अजूनही ती चांगल्या अवस्थेत आहे. इतरत्र पांगलेले सगळेजण एकदाशी संजीवनी वर एकत्र आले. थोडेसे फोटो सेशन झाले. सगळ्यांना पुढील कार्यक्रम सांगितला. एकतर भूक लागली होती आणि आमचे जेवण पाली गावातून १.३० वाजताच येवून पोहोचले होते. त्या गावाचे दोन गावकरी आमची वाट पाहत पद्मावती जवळील सदरेवर थांबले होते. आता सगळ्यांनी पटापट चालायला सुरुवात केली.
पाली खुर्द गावाचे नानासाहेब धुमाळ यांच्या ओळखीने तुषार भोसले यांनी आमची गडावर जेवणाची व्यवस्था केली होती. आमची जेवणाची उत्तम सोय झाली होती. आजचा दुपारचा मेनू होता झुणका भाकरी , झणझणीत खर्डा (ठेचा ) आणि लोणचे. आता आम्ही पद्मावतीच्या सदरेजवळ आलो. महाराज ज्या ठिकाणी बसत असत त्या जागेला मुजरा केला. आधीच आम्ही सगळी भुकेलेली पोर. सदरेखाली सर्वाची पद्धतशीर पंगत बसवली आणि झुणका भाकरीवर आडवा हात मारायला सुरुवात केली. सगळे पोटभर जेवले. ३१ डिसेंबर म्हंटले कि आमच्या सारखे खूप जन किल्ल्यावर येणार. मंदिरात जागा पकडणार. मग आम्हाला कडाक्याच्या थंडीत बाहेर झोपावे लागणार असे विचार मनात येत होते. लगेच सगळ्यांना ओर्डर सोडली. आधी मंदिरात जावून जागा पकडायची आणि मग बाकीची गडफेरी करायची. माझा घसा बसला होता. आता सगळी जबाबदारी राहुलकडे सोपवली होती. सगळेजण लगोलग पद्मावती देवीच्या मंदिरात आलो. सर्वांनी  sack ठेवल्या आणि सगळ्यांना मंदिराबाहेर जमायला सांगितले. फौजेची मोजणी केली. आता आमची संख्या  बरोबर ५० जनांची झाली होती. राहुलला गारद द्यायला सांगितली. तसा सारा राजगड शिवगर्जनेणे निनादून गेला. महेश दादा आणि नितीश आम्हास खास राजगडास भेटण्यास आले होते. त्यांना निरोप दिला. हा नितीश तर खास कॉलेजला जातो म्हणून घरात सांगून पुण्याहून राजगडी आला होता.
त्यादिवशी शिव प्रतिष्टान चा १० जणांचा ग्रुप राजगडावर आला होता. चौकशी केल्यावर ती मुले माझ्याच जवळच्या गावातली होती. इकडची तिकडची ओळख झाली. त्यावेळेस कळेल कि ते राजगडावरिल पद्मावती मंदिर, महादेव मंदिर आणि सईबाई समाधी चे रंगकाम करायला आले आहेत. ऐकून आनंद झाला. त्यांना आम्ही तुम्हास मदत करू शकतो का विचारले. त्यांनी होकार हि दिला.  हि बातमी आमच्या मंडळीना कळवली आणि सगळी मुले  हे शिवकार्य करायला तयार झाली. मंदिराच्या भिंतीवर शेवाळ साचले होते. लगोलग सगळीजण भिंती घासायला लागले. कोण पाणी आणतय कोण रंग मारतोय. आता सर्वजण कार्यात सहभागी झाले होते. आम्ही काहीजणांनी त्या परिसरातील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई सुरु केली. काहींनी मंदिराच्या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावली. हा हा म्हणता ६ वाजले. दिवस  मावळतीला चालला होता. काही कामे आटोपली होती. काही कामे बाकी होती. आता सगळे सूर्यास्त पाहायला मंदिराच्या मागे एकत्र आली. काहींची इतिहासावरील चर्चा रंगत होती. तर काही जन कचरा पेटवून शेकोटीची मज घेत होती. सूर्यास्त झाला आता रात्र झाली होती. मंदिरात राहणाऱ्या मावशींना चहाची ओर्डर दिली. सर्वांचा चहा झाला. जेवण ८ वाजता येणार होते म्हणून सात सव्वा सात च्या दरम्यान सगळ्यांना पुन्हा मंदिरासमोर एकत्र यायला सांगितले. मंदिरासमोर मोठी शेकोटी पेटवली आणि आजूबाजूने सगळेजण बसले. मी बोलायला सुरुवात केली " ह्या ट्रेक दरम्यान आलेला अनुभव किंवा आतापर्यंत हा ट्रेक कसा वाटला तो प्रत्येकाने Share करावा ". तसे एकेक जन आपला अनुभव सांगू लागला. काहींचे अनुभव ऐकून हसून हसून डोळ्यात पाणी यायचे. सर्वांचे मजेशीर अनुभव होते. त्यातल्या त्यात वैभव खेडेकर यांचा अनुभव वेगळाच होता. ह्या महाशयांचे गेल्या महिन्यात छातीचे operation झाले होते. त्यांच्या छातीला जवळपास ४५ टाके पडले होते. तरीही सह्याद्रीच्या आणि गडवाटवर असलेल्या प्रेमापोटी ते आले होते. सर्वांचा अनुभव कथन करून झाला. गप्पा रंगात आल्या तोच तुषार भोसले जेवण घेवून दाखल झाले. देवीच्या मंदिरातच आमच्या जेवण्याच्या पंक्ती उठल्या. सगळे भरपेट जेवले आणि पुन्हा शेकोटीजवळ येवून आमच्या गप्पा चालू झाल्या (वेळ ९ वाजता). काही नवीन ग्रुप आता पद्मावती मंदिराजवळ दाखल झाले होते. आमच्या फौजेने ३-४ व्यक्ती सोडल्यास पूर्ण मंदिर काबीज केले होते(आमचे नशीब कि आम्हाला मेंगाई देवीच्या आणि पद्मावती देवीच्या मंदिरात रहायची सोय झाली नाहीतर गडावरील थंडी तुम्हाला माहीतच असेल). तोरणा ते राजगडच्या पायी प्रवासामुळे सगळेच थकले होते. त्यात जेवण झाल्याने काहींच्या डोळ्यावर पेंग येत होती. शेकोटीजवळ रंगलेल्या गप्पातून हळू हळू एकेकजण कमी होत होता आणि हळूच मंदिरात पकडलेल्या जागेवर जावून झोपत होता. १२ ते १२.३० च्या दरम्यान आम्ही सुद्धा आमच्या अंथरुणात विसावलो. आता १ जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाचा प्रारंभ झाला होता. काहीजण झोपलेल्या सवंगड्याना उठवून नवीन वर्ष्याच्या शुभेच्छा देत होते. काही क्षणात सगळेच झोपी गेले. माझेही पाय चांगलेच दुखत होते. मला झोप कधी लागली हे कळलंच नाही. आमच्या कोलाहलाने गजबजलेला पद्मावती माचीवरचा परिसर आता शांत झाला होता. मंदिरात फक्त घोरण्याचा आवाज येत होता. आता राहिली होती सुवेळा माची आणि राजगडचा बालेकिल्ला.
क्रमश:

Comments

Popular posts from this blog

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

शिवकालीन लिंगाणा - भाग १

भटकंतीचा भस्म्या लागलेल्याला आपली भटकायची भूक भागवण्याकरिता एखांद्या मुहुर्ताची गरज नसती. समोर आलेल्या हिंडायच्या प्रस्तावाप्रमाणं सारं काही manage करणं त्याला आपसुकच जमत असतं. माझ्या बाबतीत सांगायच तर २०१४ मध्ये अगदी  action trekking shoes फाटुस्तोवर फिरलो. घराकडं साहजिकच कमी लक्ष दिलं गेलं. म्हणून मग ठरिवलं या वर्षी जरा समतोल राखायचा आणि घराकडं जरा जास्त लक्ष द्यायचं. पण ते काय हाय समोरून जशी एखांदी सुंदर मुलगी जात असली तर कितीही पण केलेल्या माणसाचं तिच्याकडे आपोआपच लक्ष वेधलं जातं अगदी तसच एखाद्या भटक्याच लक्ष त्याच्या डोळ्यासमोर plan होत असणार्या भटकंतीकडं आपोआपच वेधलं जातं. २०१५ सुरू झालं होतं. समोरून लय प्रस्ताव येत होते. पण कसाबसा स्वत: ला आवरून मोह टाळला होता. जानेवारी संपायच्या मार्गावर होता. महिनाभर कुठं भटकायला न गल्यानं घरातले तसे खुष होते मात्र जवळच्या मित्रांचे टोमणे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. २४,२५,२६ तीन दिवस सुट्टी जोडून आल्यानं मनाची चलबिचल सुरू झाली होती. whatsapp वर सर्वांचे message यायला सुरवात झाली होती. "कुठं जाणार असशीला तर कळीव लेका", असे बरेचसे mes...