Skip to main content

Posts

Showing posts from 2015

"A शेरीगड".

ट्रेकिंग... हा रेहमानी किडा खूप वर्षापासून अंगात वळवळतोय.. नाद, व्यसन आणि माझ्या भाषेत सांगायचे झाल्यास खाज यालाच म्हणतात... हाफिसला सुट्टी असली कि हा किडा वळवळू लागतो. मग जमेल तसा वेळात वेळ काढून शहरालगत जवळपास कोणत्याही गडकिल्ल्यावर किंवा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी जावून ट्रेक करू लागलो... जुन्या नव्या मित्रांना फोनाफोनी, फेसबुक Whats App वर चाटाचाटी करायची, प्लान ठरवायचे नि सुमडीत जावून यायचे माझे उद्योग काही महिने बंद झाले होते... पण त्याचा जास्त काळ निभाव लागला नाही... गेल्या वर्षी विक्रांतसोबत दोन-चाकीवरून उत्तर कोकणातील सात सागरी किल्ले फिरून आलो... पण इथल्या डोंगरी किल्ल्यांची सफर या ना त्या कारणाने हुकली... शेवटी मुहूर्त भेटला... आजकाल माझी सुट्टी weekdays  मध्ये येत असल्याने कोणीतरी रिकामटेकडा शॊधत होतो आणि तो सापडला... किल्ला ठरला तो "अशेरीगड". भर पहाटे उठून आवरावर केली... आई-बाबांना कुठे चाललोय याची माहिती रात्रीच दिली होती... ५ वाजता घर सोडले... दादरहून पालघरला जाणारी डहाणू लोकल ५:४१ ची आहे... ती सुटली... माझ्याआधी येवून वाट पाहणाऱ्या मित्र...

निसर्गाशी ऋणानुबंध

दिवसागणिक दिवस जात असतात. काम, घराच्या जबाबदाऱ्या आणि काही कर्तव्य यातून फारसा वेळ मिळतच नसतो. त्यात सगळच वेळेवर होत अस नाही म्हणजे आमच्या आयुष्यात कधी झालच नाही. पण म्हणून निराश होण हे शेवटच कारण नाही. निराश कधी झालोच नाही. कधी थांबलोच नाही. कधी मागे फिरुन पाहिलच नाही. जे आहे त्यांना घेऊन चालत राहिलो, पडत राहिलो, धडपडत राहिलो, प्रसिद्ध नाही झालो, पण सिद्ध झालो. तो या भटकंती मुळेच. निसर्गाशी असलेला रुणानुबंध आणि रक्तातील तेज जागवुन ठेवण्यासाठी भटकंती शिवाय दूसरा पर्यायच असू श कत नाही. स्वावलंबन, आत्मविश्वास, साहस, जिद्द, बंधुभाव, समजुतदारपणा, तडजोड, ध्येयासक्ती, निसर्गप्रेम, प्रसंगावधान, संकटांशी मुकाबला एवढं सगळ कमवल ते या सारासार प्रपंचातुन. कधी स्पर्धा केली नाही पण म्हणून आव्हान उडवली सुद्धा नाहीत. ती पुरेपूर पेलुन धरली. वेळेच बंधन तर नव्हतच आणि आर्थिक अडचण ही भासली नाही, तशी भासूच दिली नाही कारण ' शेजाऱ्याच पोर पाजाऱ्याकड़े ठेऊन शौक करण ' आमच्या हिशोबात नसत.  या निसर्गान अर्थात सह्याद्रीन त्याच्या अष्टपैलू सौंदर्यान मोह घातला आहे तो सुटने शक्य नाही. निसर्गाच रौद्र...

अनामिक वाटेन केलेली नामिक भटकंती- नाथ बाबाच्या गुहा आणि हिरवा सह्याद्री.

सुट्टीवर आल्यापासून दोन आठवडे घरचीच काम चालली होती. कुठ फारस बाहेर जायला मिळाल नाही. गावाहुन येताना वरंधा घाटान आलो न दुपारी हुक्की आली म्हणून कर्नाळा एवढाच काय ते फिरण. तस ही आठवडा सुट्टी साठी इतर भटक्यांचे प्लान तर नेहमीचेच होते. पाऊस ही तसा उघड उघड पडायला सुरवात झाली होती. याच वेळी कस काय ते मला दुर्बुद्धी सुचली न स्टेट्स टाकला. स्टेट्स टाकताच भूषणचा फोन आला म्हणला नाथ बाबा च्या गुहा करायच्या का..? मी ऐकल होत पण गेलो नाही कधी. म्हटल,' ठीक...ठरल'.  कोणाला न सांगताच गाडी हाकली सकाळी.  नेहमी प्रमाणे विसावा नाश्ता करायच ठरल पण भूषण म्हटला खोपोलीलाच करु डायरेक्ट. मग सुसाट खोपोली. नाश्ता वगेरे करुन बाईक जाते तिथवर घालायची या अटीवर झेनित च्या दिशेन गेलो. दोघ ही अवली-भटके. दत्ताच देऊळ आहे तीथवर गाडी गेली. गाडी तीथ लावून आम्ही वाटेचा विचार करत होतो. कारण दोघांना ही वाटेची ख़ास कल्पना नव्हती. मग एक पुजारी वजा गावकरी भेटला त्याला विचारल तर म्हणे," आत्ता जाणार..? चार बोगदे पार करावे लागतात.."  आमच उत्तर," तूम्ही रस्ता सांगा, चार बोगदे न चार डोंगर आम्ही बघतो ...

क्रांतीदिन विशेष- मराठ्यांची रणांगणे - उंबरखिंड

खुप दिवस सुहास बरोबर भटकंती झाली नव्हती. त्यात रविवार भेटला तो सुद्धा अर्धा. त्यात हे महाशय ऑफिसच्या आउटडोर ट्रिप साठी जाणार होते. साल्यान मला रात्री सांगितल नाही कुठे जाणार ते. पण दुसऱ्यादिवशी कॉल आला बोलण नेहमी प्रमाणे," भटक्या आहेस कुठे..? लगेच ये मी कंटाळलो आहे इथे."  मी म्हटल," ते ठीक आहे पण येऊ कुठे...?" तस मी याला कुठे-कशाला-काय आहे-कोनासाठी-काय मिळणार-कस जायच हे असेल फालतू प्रश्न विचारत नाही.  उत्तर," एक्वा इमजीका ला ये."  आईशपथ सांगतो एवढा हसून हसून मेलो असेल ना मी. Bc तू काय तिकड करतोय...:p  " कराव लागत बाबा नोकरीसाठी...."  मी म्हटल बर येतो आपण उंबरखिंडीला जाऊ. आणि बाईक ला स्टाटर मारून मी सुटलो. तिथे जावून पाहिल तर अजुन एक परिवार होता त्यांना तस काहीच माहिती नव्हतं त्या स्मारकाबद्दल. सुहास ने खुप सांगितल. आमच्याबद्दल सांगितल. आमच्या गडवाट बद्दल सांगितल. आम्ही काय कस कोणासाठी करतो हे सुद्धा सांगितल. अस हे सगळ बोलताना सुहास एका वेगळ्याच विश्वात निघुन जातो. आम्ही मग गारद सुद्धा दिली. त्यांनी आमचा हात हातात घेऊन डोक्याला लावला. ...

सहयाद्री तुमचा बाप म्हणून काळजी घ्या.

काही गोष्टी-ठिकाण अविरत दिमाखान स्वतःच वेगळपण टिकवून ठेवत असतात. बदलते हवामान, ऋतु , नक्षत्र, नैसर्गिक आपत्ती इ गोष्टीत सुद्धा त्या कणखर आणि अनुभवी तेजपुंज तपस्वी प्रमाणे मानेच शिखर उंच ठेवत असतात. आपण विचार करतोय तो बेलाग, अमर्याद निसर्ग संपत्ती, उंच उंच शिखर, काळ्या कातली निर्जन जागा, लांबच लांब पसरलेली रान आणि त्यांच्या पोटात कोळ्याच्या घरट्याप्रमाणे कोरलेल्या रानवाटा आणि कुठे एखादा जीरे टोप घालून त्यात मानाचा तुरा खोउन आपल वेगळेपण दर्शवणारा स्वराज्याचा साक्षीदार एखादा किल्ला-गड-दुर्ग. 'महाराष्ट्र हां दुर्गांचा देश आहे. दोन-चार डोंगर उतरून गेल की एखादा डोंगर डोक्याला तट-बुरुजांच शेले-पागोटे बांधून उभा असतो.' अस महान भटके-लेखक म्हणतात ते खरच. यातील अनेक दुर्गांनी शिवछत्रपतींच्या चरणाची धुळ सुद्धा आपल्या ललाटी फासली आहे. यांचे स्वातंत्र्य टिकवाया अनेक सह्यपुत्रांनी रक्ताचे सडे शिंपले आहेत त्यांच्या अद्भुत पराक्रमानी हां हां अखंड सह्याद्री आजही त्यांची थोरवी गातो...ती ऐकू येते..आजही..कधी घराबाहेर पावल नेउन पहा,या सह्याद्रित जा, फिरा आणि ऐका. आजही हां पुराणपुरुष त्यांच्या पर...

शिवकालीन लिंगाणा - भाग २

१२ वाजता झोपलो खरे पण कसय की २ वाजल्याशिवाय माझ्या डोळ्यांच्या पापण्या काही मिटल्या जात नाहीत. थोडा वेळ तसाच पडून राहिलो. मग मात्र तडक उठलो, सोबत सूर्यकांतही उठला. रायलिंगाच्या छाताडावर सह्याद्रीतल्या त्या बेभान वार्याने भयाण शांततेला चिरून आपल्या आवाजाचे खेळ चालू केले होते. चंद्राचा पुरेसा उजेड समोर असणार्या अर्दांडासारख्या लिंगाण्याची एखाद्या काळ्या कुट्ट रामोश्याप्रमाणे भासणारी काया अगदी स्पष्टपणे दाखवत होता. दूरवर तिकडे उजव्या हाताला समाधिस्त महाराजांच्या बाजूला असणारा सौरदिवा लकलकत होता. तर सिंगापूर गावातून काही श्वानांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. जेवण बनविण्यासाठी बनविलेल्या चुलीपाशी आधीच दोघं तिघं आडवे झाले होते. मी आणि सुर्यकांतने मग समोरच्या मैदानातच पडी घेण्याचा निर्णय घेतला. गप्पा-टप्पा संपवून मग २च्या सुमारास आम्ही कसेबसे झोपी गेलो. सकाळ झाली. तांबडं कवाच फुटलं होतं. तसं आम्हाला उठायला थोडा उशीरच झाला होता. सगळं काही आवरतं घेऊन harness बांधूनच मग आम्ही बोराट्याच्या नाळीतून रायलिंग उतरू लागलो. मनात एकच विचार घेऊन सारी मंडळी लिंगाण्याच्या सुळक्याला गवसणी घालायला ...

शिवकालीन लिंगाणा - भाग १

भटकंतीचा भस्म्या लागलेल्याला आपली भटकायची भूक भागवण्याकरिता एखांद्या मुहुर्ताची गरज नसती. समोर आलेल्या हिंडायच्या प्रस्तावाप्रमाणं सारं काही manage करणं त्याला आपसुकच जमत असतं. माझ्या बाबतीत सांगायच तर २०१४ मध्ये अगदी  action trekking shoes फाटुस्तोवर फिरलो. घराकडं साहजिकच कमी लक्ष दिलं गेलं. म्हणून मग ठरिवलं या वर्षी जरा समतोल राखायचा आणि घराकडं जरा जास्त लक्ष द्यायचं. पण ते काय हाय समोरून जशी एखांदी सुंदर मुलगी जात असली तर कितीही पण केलेल्या माणसाचं तिच्याकडे आपोआपच लक्ष वेधलं जातं अगदी तसच एखाद्या भटक्याच लक्ष त्याच्या डोळ्यासमोर plan होत असणार्या भटकंतीकडं आपोआपच वेधलं जातं. २०१५ सुरू झालं होतं. समोरून लय प्रस्ताव येत होते. पण कसाबसा स्वत: ला आवरून मोह टाळला होता. जानेवारी संपायच्या मार्गावर होता. महिनाभर कुठं भटकायला न गल्यानं घरातले तसे खुष होते मात्र जवळच्या मित्रांचे टोमणे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. २४,२५,२६ तीन दिवस सुट्टी जोडून आल्यानं मनाची चलबिचल सुरू झाली होती. whatsapp वर सर्वांचे message यायला सुरवात झाली होती. "कुठं जाणार असशीला तर कळीव लेका", असे बरेचसे mes...