Skip to main content

Posts

Showing posts from July, 2013
त्रिंगलवाडी ट्रेक भाग-२ गडाच्या दिशेने चालायला लागलो तसा ढगोजीरावांनी एकत्र येवून बरसायला सुरुवात केली. मस्त पावसात भिजत रानातून असलेल्या वाटेवर चालत एकेकजण पुढे पुढे जात होता. वाटेच्या कडेने भाताची पिके हिरवळीने सजली होती तर कुठे शेतकऱ्यांची बैलजोडीसोबत नांगरट चालू होती. साखरेच्या वासाने मुंग्या जश्या एकामागे एक चालत वाट काढत त्या साखरेला भिडतात तसे आम्ही गडाच्या दिशेने चाललो होतो. किल्ल्याचा इतिहास एवढाच वाचनात येतो कि किल्ल्याच्या पायथ्याशी असणाया जैन लेण्यांवरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १०व्या शतकात झाली असावी. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ऐकिवात नाही. पण १६८८ च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. गडाच्या पायथ्याशी दहाव्या शतकात खोदलेली जैनधर्मीय गुहा लागली सध्या तिला पांडवलेणी असे म्हणतात. गुहेच्या गाभाऱ्यात भगवान गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती आहे (यवनी सत्तांनी केलेल्या आक्रमणात याही मूर्तीची विटंबना झाली आहे). गुहेत असलेल्या चार खाम्बापैकी ३ खांब पडले किंवा पाडले आहेत. एकाच खांब सध्या सुस्थितीत आहे. हि गुहा प्रशस्त असून येथील म...
त्रिंगलवाडी ट्रेक भाग- १ त्रिंगलवाडी… नाव ऐकूनच काही नवे ट्रेकर्स अचाट पडतात. पण गुगल, पुस्तके आणि इतर मित्रांकडून हा एक किल्ला आहे अशी माहिती त्यांना मिळत जाते. येथे कधी जायचे कोणत्या मार्गाने जायचे आणि कोणत्या हंगामात जायचे हे ठरवत एकदाचा तो ट्रेकर जावून येतोच. धुक्यांची नगरी इगतपुरीपासून १०-१५ किमी अंतरावर हा किल्ला आहे. पावसाळ्यात इथला निसर्ग या शहरावर भरगोस कृपादृष्टी दाखवतो. आपला हिरवाकंच शालू सह्याद्रीवर पांघरतो आणि धुक्यांनी ओढून लोकांची नजर चुकवितो.  इगतपुरी शहरालगत खूप गडकिल्ले पाहण्यासारखे आहेत त्यातलाच एक त्रिंगलवाडीचा किल्ला.  गडवाटची या पावसाळ्यातील हि पहिलीच गडभ्रमंती….दरवेळी प्रमाणे यावेळी देखील नवी जुनी मित्र मंडळी ट्रेकसाठी इच्छुक झाली… आमचा वैभ्या, पराग मोहिते, जोतीराम सारख्यांनी ऐनवेळी टांग दिली. तर लोभ्या, रविभाऊ शेडगे , सिद्धेश, मंगेश , शंकर बापू यांना खूप Miss केलं. पुण्याहून विशाल आणि रवि आदल्या दिवशीच इगतपुरीत मुक्काम ठोकून होते. "औरंगाबाद नाही संभाजीनगर म्हणा" इथून प्रतिक, अभिनव, रुपेश, नितीन व प्रशांत यांची Gang रविवारी सकाळी निघाली ...
सफर सप्तदुर्गांची भाग-२ सकाळपासून आभाळ दाटलेलं होत. ढगोजीचे सैनिकांनी सुर्याजीरावास वेढा दिला होता त्यामुळे हवेत थोडासा गारवा निर्माण झाला होता. पण दुपारी १२.३० नंतर ढगोजीरावांच्या सैनिकांना नेस्तनाबूत करून सुर्याजीरावांनी लढाई जिंकली. जोरदार उन लागायला सुरुवात झाली होती. बोइसर ते शिरगावचे अंतर ११ किमी इतके आहे. बोइसर रोडवरून पालघर गावाच्या चौकात पोहोचल्यावर उजवीकडे वळावे. तो रोड थेट माहीम - केळवे- दांडा या गावांकडे जातो. २-३ किमी पुढे गेल्यानंतर पुन्हा एक फाटा लागतो तो शिरगावला जातो. त्या दिशेने वाट धरावी.. बोइसरहून शिरगावात पोहोचायला आम्हास ३० मिनिटे लागली. गावात गेल्यावर किल्ल्यावर जाणारा रस्ता विचारत आम्ही एकदाशी किल्ल्याजवळ पोहोचलो. समुद्र किनाऱ्याला लागुनच शिरगावचा किल्ला आहे.. गेल्या क्षणीच किल्ल्याच्या मुख्यद्वारावर असलेल्या दोन कमानी/मनोरे लक्ष वेधून घेतात. मी अजूनपर्यंत इतर किल्ल्यांवर अश्या कमानी पहिल्या नव्हत्या. टेहळणी साठी यांचा वापर केला जात असे.. किल्ल्यात प्रवेश करायच्या आधी भिंतीवर एक माहिती लिहिली होती ती म्हणजे "किल्ल्यात शौचालय...
सफर सप्तदुर्गांची भाग-१ रखरखते ऊन, चेहरा व मान करपवून टाकणारा सूर्याजीराव, घामाची होणारी लाही आणि पाण्याची बोंब करणारा मे महिना म्हणजेभटक्यांसाठी शापच म्हणावा लागेल. पण काहीजण त्याला अपवाद आहेतच. उन्हाळा असो वापावसाळा सह्याद्रीत भटकायची खाज असणाऱ्यांना सगळे ऋतू सारखेच. मागील एप्रिल महिन्यात अर्नाळा ट्रेक केल्यानंतर कुठे जायचे या निर्णयाला १0-१५ दिवस लागले.त्यात रामशेजचा ट्रेक रद्द झाला होता. काही मित्र लग्नसराई आणि गावाला मजामारण्यात बिझी होते.… त्यात माझे यावेळी एकटेच भटकून यायचे ठरले होते. पण काय सांगू अपने मुह मे कोई बात छुपतीच नही.. २५ तारखेला निल्याच्या लग्नादिवशी बकलोच. तरीही काहीजनानीच होकार दर्शवला आणि तुला रात्री सांगतो म्हणाले. रात्री सांगतो म्हणजे यांचा काही नेम नाही हे नक्की असते आणित्यांना रात्री पुन्हा फोन करून खाजवून अवदान आणण्याचा मीही प्रयत्न केला नाही..आमचा सह्यमित्र विक्रांतराव गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाला होता. मलाही तेवढेच हायसे वाटले. गड्याची bike होती ना.. ट्रेनची झनझट नव्हती कि वडापसाठी वाट पाहत बसायची गरज नव्हती. त्यात हा जॉन अब्राहमचा बा...
सफर K2 ची भाग-२ आमच्या गाडीचा driver गुणी माणूस होता. गपचूप काहीही न बोलता सांगेल तिथे गाडी थांबवत असे. आता सूर्य पूर्ण उगवला होता. अलिबागच्या लोकांची तसेच बाहेरून आमच्यासारख्याची दाटीवाटी हळू हळू वाढत होती. अलिबाग जिल्हा कार्यालयासमोरील टपरीजवळ गाडी थांबवली सर्वांचा चहापाणी झाला व एकामागोमाग तर काही घोळक्याने कुलाबा किल्ल्याकडे चालायला सुरुवात केली. ५ मिनिटात आम्ही सर्वजन किनाऱ्यावर आलो. मुलांची फोटोग्राफी  सुरु झाली. इस टाइम आपुनका भी कॅमेरा था. मी सुद्धा सुरु झालो. ओहोटी असल्यामुळे चालत इतिहासावर गप्पा मारत कुलाबा किल्ल्याच्या महाद्वाराजवळ पोचते झालो. महाद्वाराच्या आतील बाजूस पुरातत्व खात्याचे हाफिस आहे. किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून येथे शुल्क आकारले जाते. आम्ही पोहोचलो तेव्हा त्या ऑफिसला टाळा होता शेवटी सरकारी नोकर ना… थोडेसे पुढे गेल्यावर गडाच्या इतिहासाचा माहितीफलक आहे. सर्वाना एकत्र करून अनिरुद्ध ने माहिती सांगितली. रामने गारद दिली आणि गडफेरी साठी निघालो. एक दीड तासात गडफेरी पूर्ण झाली.   किल्ले कुलाब्याचा थोडक्यात इतिह...
सफर K2 ची भाग-१ शीर्षक नाव पाहूनच हडबडला असाल ना ? K२ म्हणजे माउंट ऐवरेस्ट च्या खालोखालचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच गिरी शिखर. विचार करत असाल कि हा कधी जावून आला इथे... नाही नाही अजून गेलो नाही तिथे पण महत्वाकांक्षा बाळगून आहे हो... पण त्याआधी महाराष्ट्रातील या सह्याद्रीतील सर्व गडकिल्ले व गिरीशिखरे पादाक्रांत केल्यानंतरच.. हि इच्छा कधी पूर्ण होईल ते देव जाने.. या विविधतेने नटलेल्या समृद्ध महाराष्ट्रात (सध्या दुष्काळात होरपळत आहे) पर्यटन क्षेत्र खूप आहे. पण आजकालच्या अडाणी(सुशिक्षित) लोकांना त्याचे मोल नाही. बोलतात ना जिथे पिकते तिथे विकत नाही. आणि हे अडाणी(सुशिक्षित) जिथे पिकवायला(फिरायला) जातात तिथे यांना कोणी इचारत नाही पण पैसा मात्र विकून येतात.(Tours&travels व इतर संस्थेने दुर्लक्ष करावे ) आमची लोक राजस्थानात जातात म्हणे. आणि महाराष्ट्रात परतल्यावर एक विधान करतात. "बघा बघा त्या किल्ल्यांकडे आजही किती चांगल्या अवस्थेत आहेत. काय त्या किल्ल्यावरील नक्षीकाम, काय त्या किल्ल्याचे बुरुज, काय त्यांच्या तोफा असे अजून काही... ज्या राजस्थानाचे राजे (अपवाद पृथ...
प्रवास चंदेरीचा भाग-३ आता सगळेजण चंदेरी कडे मार्गस्थ झाली होती. सर्वात मागे मी, आमचा Being रवी (Real सलमान) , विकास चौधरी, आबा , शंकर बापू आणि संदीप दादा राहिलो होतो. कारण सर्वांच्या उद्या सकाळच्या नाश्त्याची शिदोरी आमच्याकडे होती. रामने घरातून  शिजवून आणलेली अंडी, तसेच ब्रेडचे पुडे एका खोक्यात्तून आणले होती. वजन जर जास्तच होत. दीडशे अंडी आणि पंचवीस ब्रेडचे पुडे मिळून खोक्याचे जवळपास १०-१५ किलोचे वजन झाले असावे. आम्ही हा नाश्त्याचा box एकेक करून घेणार होतो. परंतु रविने मीच घेतो हा box आणि तुम्ही माझी फक्त sack सांभाळा असे सांगितले. रवीने box उचलला आणि मार्गी लागला. वजनदार box  घेवून काही वेळातच रवि आमच्या थोडासा पुढे गेला. त्या भयाण जंगलात आता या शहरातील ६८ जनावरांचा आवाज घुमत होता. torch च्या लखलखाटात जंगल झगमगून गेले होते. अर्धा तासाच्या रपेटीनंतर आता चढ लागला होता त्यामुळे आता दमछाक होणार होती. आणि थोड्याच वेळात एक अघटीत घडल.. अचानक वरून दगडे येवू लागली. आम्ही घाबरूनच गेलो. त्यात पोरांचा कल्ला वाढला. शेवटी...
प्रवास चंदेरीचा भाग-२ आता ठरलेल्या वेळेनुसार एकेकजण येत होते.. पुण्याहून राहुल, व्यंक्या , पंक्या अशी मिळून ७ जन येवून हॉटेलात जेवायला गेली होती.. हा हा म्हणता ३०- ४० जन आली.. तोपर्यंत travels पनवेलच्या ब्रिजखाली येवून उभी राहिली... मंचर येथून कोकणे बंधू डेपोत दाखल झाले.. मंग्याची आणि राजेशची मित्रमंडळी आली.. त्यात काही अनधिकृत मित्र सुद्धा हजर झाले.. पराग, ओमकार सारखे.. सर्वांना घेवून travels मध्ये बसवले. त्यात नेरूळहून संदीप दादां छोटा हत्ती घेवून निघाले.. सगळे जमायला १०.३० वाजले. काही सदस्य नवे असल्याने त्यांची घाई चालली होती. कितीला निघणार.. वेळ होतोय..  त्यात नाश्ताची सोय रामला करायला लावली होती. तो आणि विक्रांत खरेदीसाठी गेले होते. आणि हो एक सांगायचं  राहिलच माझ्या अनधिकृत यादीतल्या विठ्ठल गोरे यांचा फोन १० वाजता आला होता कि तोही येतोय. गडी स्टुडीओतून नुकताच निघाला होता व त्याला तसेच आबासाहेब आणि बापूला पनवेल मध्ये येण्यासाठी ११.३० तरी वाजणार हे निश्चित होते. येथूनच वेळेचे नियोजन फिसकटायला सुरुवात झाली. मी तर  अगदी भैसातून गे...