सफर K2 ची भाग-२
आमच्या गाडीचा driver गुणी माणूस होता. गपचूप काहीही न बोलता सांगेल तिथे गाडी थांबवत असे. आता सूर्य पूर्ण उगवला होता. अलिबागच्या लोकांची तसेच बाहेरून आमच्यासारख्याची दाटीवाटी हळू हळू वाढत होती. अलिबाग जिल्हा कार्यालयासमोरील टपरीजवळ गाडी थांबवली सर्वांचा चहापाणी झाला व एकामागोमाग तर काही घोळक्याने कुलाबा किल्ल्याकडे चालायला सुरुवात केली. ५ मिनिटात आम्ही सर्वजन किनाऱ्यावर आलो. मुलांची फोटोग्राफी सुरु झाली. इस टाइम आपुनका भी कॅमेरा था. मी सुद्धा सुरु झालो. ओहोटी असल्यामुळे चालत इतिहासावर गप्पा मारत कुलाबा किल्ल्याच्या महाद्वाराजवळ पोचते झालो. महाद्वाराच्या आतील बाजूस पुरातत्व खात्याचे हाफिस आहे. किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून येथे शुल्क आकारले जाते. आम्ही पोहोचलो तेव्हा त्या ऑफिसला टाळा होता शेवटी सरकारी नोकर ना… थोडेसे पुढे गेल्यावर गडाच्या इतिहासाचा माहितीफलक आहे. सर्वाना एकत्र करून अनिरुद्ध ने माहिती सांगितली. रामने गारद दिली आणि गडफेरी साठी निघालो. एक दीड तासात गडफेरी पूर्ण झाली.
किल्ले कुलाब्याचा थोडक्यात इतिहास असा :-
"रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे ठिकाण म्हणजे अतिशय प्राचीन असं ठिकाण! हा संपूर्ण परिसर ‘अष्टागर’ या नावाने ओळखला जातो. आठ गावांचं म्हणजेच आगारांच मिळून होतं ते ‘अष्टागर.’ चौल, अक्षी, नागाव, अलिबाग, साखर, थळ, आवास अन् किहीम अशी ती आठ ठिकाणे. याचं महत्त्व प्राचीन काळापासून इतकं आहे की याच अष्टागरात बौद्धांनी लेणी कोरली, जैनांनी मंदिरं उभारली. बलरामाची पत्नी रेवती ही रेवदंड्याची स्वामिनी, कनेकश्वराचा महादेव अशी अनेक पूजनीय ठिकाणं येथे आहेत. च्यवनऋषीची तपोभूमी सुद्धा हेच अष्टागर होते आणि आजचा आपला असलेला किल्ला हा याचा स्वामी आहे. तो म्हणजे किल्ले ‘कुलाबा!’
मौजे नवघर येथे समुद्रावर खडक होता. त्यावर भिवजी गुजर यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची चौकी होती. १६८०-८१ या कालावधीत शिवछत्रपतींच्या प्रेरणेने हा किल्ला उभारला गेला. याचे काही बांधकाम संभाजी महाराजांनी पूर्णत्वास नेले. त्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रेंना १६९८ साली आरमार प्रमुख म्हणून नेमले आणि सरखेल ही पदवी दिली. (सरखेल या शब्दाचा अर्थ आरमाराचा सर्वाधिकारी) आणि त्यानंतर कुलाबा किल्ला खर्या अर्थाने प्रसिद्धीस आला. शिवरायांची गनिमी काव्याची पद्धत याच कान्होजींनी समुद्रात सुरू केली. ‘नजर ससाण्याची, झेप गरुडाची व पकड मगरीची’ अशा शब्दात लोक त्यांना ओळखत. ‘समुद्रावरील शिवाजी’ म्हणून त्यांचे नाव प्रसिद्धीस पावले होते. अशा कान्होजींनी कुलाबा किल्ल्याची आपले प्रमुख ठाणे म्हणून निवड केली होती. यावरून कुलाबा किल्ल्याचे महत्त्व आपल्या सहज लक्षात येईल. पोर्तुगिज, फ्रेंच, इंग्रज, डच या परकीय दर्यावर्दी लोकांच्या उरात कुलाब्यावरील कान्होजी आंग्रे यांच्या वास्तव्यामुळे कुलाब्याचे नाव काढताच धडकी भरत असे. त्यामुळेच आग्रे घराण्याच्या पाच पिढ्या कुलाबा किल्ल्यावर नांदल्या.अर्धा कि. मी. अंतरावर दक्षिणोत्तर पसरलेल्या खडकावर किल्ले कुलाबा उभा आहे. तर त्याला चिकटूनच ‘सर्जेकोट’ नावाचा त्याचा उपदुर्ग उभा आहे.
समुद्राने वेढलेल्या या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण ओहोटीच्या काळात किनार्यावरील वाळूतून १५-२० मिनिटात चालत जाता येते. पण त्यासाठी भरती-ओहोटीचं वेळापत्रक माहीत असणं फार गरजेचं आहे. मराठी पंचांगाप्रमाणे जी तिथी असेल त्या संख्येला ३/४ ने गुणल्यावर जो आकडा येतो त्या वेळेस पूर्ण भरती येते. चोवीस तासात दोन वेळा बारा तासांच्या अंतराने पूर्ण भरती येते. पूर्ण भरतीनंतर सहा तासाने पूर्ण ओहोटीची वेळ असते. आपण आहोटीची वेळ अचूक साधून थोड्या वेळात गडाच्या प्रवेश द्वारासमोर पोहोचायचे. कुलाबा किल्ला बघताना वेळेचे भान ठेवावेच लागते. कारण पूर्ण ओहोटीनंतर पुन्हा दीड तासात किल्ल्यासमोरील वाळूच्या किनार्यावर पाणी भरायला सुरवात होते.
गडाच्या पूर्वेकडील महाद्वार आजही चांगल्या अवस्थेत आहे. यावर मोर, हत्ती, हरीण, वाघ आदी पशू-पक्ष्यांची चित्रे कोरलेली आहे. येथून आत गेल्यास आणखी एक दरवाजा लागतो आणि नंतर लगेच पुरातत्त्व विभागाचे कार्यालय आहे. तेथे ५ रु. चे नाममात्र शुल्क पर्यटकांकडून आकारले जाते. याच कार्यालयातील व्यक्ती आपल्याला भरतीच्या आधी केव्हा गेले पाहिजे, ते न चुकता सांगते. कारण येथे अनेकदा भरतीच्या पाण्यात पर्यटक वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. येथून पुढे श्रीपद्मावतीची घुमटी आहे. तर तिच्या किंचित दक्षिण बाजूस श्री गुलाबाई ऊर्फ महिषासुरीची मूर्ती आहे. येथूनच मळलेली वाट आहे ती पुढे गडदेवता श्री भवानीच्या मंदिरास जाते. हे मंदिर चांगल बांधलं असून, त्याच मंदिरात वेताळ व गणेशाची मूर्ती सुद्धा आहे. बाप्पुलाच गोड्या पाण्याची बारामाही विहीर आहे.
त्या वाटेनं तसंच पुढं गेलं की विस्तीर्ण अशी पुष्करणी लागते. जवळपास ३५ मी. ३८ मी. इतकी मोठी ही पुष्करणी आहे. गोड्या पाण्याचा हा किल्ल्यावरील सगळ्यात मोठा साठा. परंतु सध्या वापर नसल्याने त्यावर शेवाळ साचले आहे. पुष्करणी समोरच श्री गणेशपंचायतानाचे सुरेख असे मंदिर आहे. पंचायतन म्हणजे गणपतीशिवाय गाभार्यात इशान्येस श्रीदेवी, आग्नेयेस सूर्य तर मागील बाजूस शंकर व विष्णुमूर्ती आहे. याच पुष्करणीच्या मागील बाजूस आंग्रांच्या भग्न वाड्याचे अवशेष आहे. या वाड्यांना पाच आगी लागल्याची इतिहासात नोंद आहे. त्यातल्या दोन फार मोठ्या होत्या.
या किल्ल्याला एकूण सतरा बुरुज आहे. पण त्यांच्या नावात एकवाक्यता नाही. तसेच या किल्ल्याचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे मोठमोठे दगडाचे चिरे फक्त एकमेकांवर ठेवून याची उभारणी केली आहे. त्यात दुसरा कुठलाच पदार्थ नाही. शिवरायांच्या दुर्गबांधणीतला हा एक वेगळाच प्रयोग होता.
असा कुलाबा किल्ला एक वेळ समुद्रावर मराठ्यांचा असलेल्या वर्चस्वाचा साक्षीदार आहे."
कोर्लई किल्ल्याचा थोडक्यात इतिहास असा :-
या सह्याद्रीत मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा खूप काही साठवून घेवून जातो.. मग तो थरार असो.. सह्याद्रीचे सुंदर किंवा रांगडे रूप असो.. माना टाकलेल्या कमानी असो.. पडलेल्या बुरुजांचे दगड असो...माणसांचे स्वभाव असो.. सर्वकाही अनुभव या फाटक्या झोळीत घेवून जात असतो.. आणि झोळी फाटकी असल्याने पुन्हा सह्याद्रीत येत असतो तो अनुभव पुन्हा घ्यायला...
या सह्याद्रीत येताना खालील ओळी नक्की लक्षात ठेवा.
"हा सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच रौद्र आहे.
तो आधीच जाणवून देतो काय करावे नि काय न करावे.
मी तर एक शून्य त्यापुढे शेवटी तो माझा गुरु आहे."
ह्या लेखाच्या माध्यमातून गड किल्ल्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा माझा उद्देश. जेणेकरून गडकिल्ल्यांविषयी लोकामध्ये आवड निर्माण व्हावी. ट्रेकिंगच्या माध्यमातून का होईना त्यांना भेट देत चला.
तुम्हाला इतिहास ऐकायचा असेल तर त्या त्या गडांच्या चिरेबंदी बुरुजाला कान लावून ऐका.
"तुम्हाला आवाज येईल त्या आर्त किंकाळीचा. ..
तुम्हाला आवाज येईल खनाननाऱ्या तलवारीचा...
तुम्हाला आवाज येईल बुरुजावरून धडाडनाऱ्या तोफांचा..
तुम्हाला आवाज येईल त्या शूर मावळ्यांचा "हर हर महादेव..हर हर महादेव.. हर हर महादेव.. "
यासाठीच हा लेखनप्रपंच.
।। जय शिवराय ।।
- जातिवंत भटका
मौजे नवघर येथे समुद्रावर खडक होता. त्यावर भिवजी गुजर यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची चौकी होती. १६८०-८१ या कालावधीत शिवछत्रपतींच्या प्रेरणेने हा किल्ला उभारला गेला. याचे काही बांधकाम संभाजी महाराजांनी पूर्णत्वास नेले. त्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रेंना १६९८ साली आरमार प्रमुख म्हणून नेमले आणि सरखेल ही पदवी दिली. (सरखेल या शब्दाचा अर्थ आरमाराचा सर्वाधिकारी) आणि त्यानंतर कुलाबा किल्ला खर्या अर्थाने प्रसिद्धीस आला. शिवरायांची गनिमी काव्याची पद्धत याच कान्होजींनी समुद्रात सुरू केली. ‘नजर ससाण्याची, झेप गरुडाची व पकड मगरीची’ अशा शब्दात लोक त्यांना ओळखत. ‘समुद्रावरील शिवाजी’ म्हणून त्यांचे नाव प्रसिद्धीस पावले होते. अशा कान्होजींनी कुलाबा किल्ल्याची आपले प्रमुख ठाणे म्हणून निवड केली होती. यावरून कुलाबा किल्ल्याचे महत्त्व आपल्या सहज लक्षात येईल. पोर्तुगिज, फ्रेंच, इंग्रज, डच या परकीय दर्यावर्दी लोकांच्या उरात कुलाब्यावरील कान्होजी आंग्रे यांच्या वास्तव्यामुळे कुलाब्याचे नाव काढताच धडकी भरत असे. त्यामुळेच आग्रे घराण्याच्या पाच पिढ्या कुलाबा किल्ल्यावर नांदल्या.अर्धा कि. मी. अंतरावर दक्षिणोत्तर पसरलेल्या खडकावर किल्ले कुलाबा उभा आहे. तर त्याला चिकटूनच ‘सर्जेकोट’ नावाचा त्याचा उपदुर्ग उभा आहे.
समुद्राने वेढलेल्या या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण ओहोटीच्या काळात किनार्यावरील वाळूतून १५-२० मिनिटात चालत जाता येते. पण त्यासाठी भरती-ओहोटीचं वेळापत्रक माहीत असणं फार गरजेचं आहे. मराठी पंचांगाप्रमाणे जी तिथी असेल त्या संख्येला ३/४ ने गुणल्यावर जो आकडा येतो त्या वेळेस पूर्ण भरती येते. चोवीस तासात दोन वेळा बारा तासांच्या अंतराने पूर्ण भरती येते. पूर्ण भरतीनंतर सहा तासाने पूर्ण ओहोटीची वेळ असते. आपण आहोटीची वेळ अचूक साधून थोड्या वेळात गडाच्या प्रवेश द्वारासमोर पोहोचायचे. कुलाबा किल्ला बघताना वेळेचे भान ठेवावेच लागते. कारण पूर्ण ओहोटीनंतर पुन्हा दीड तासात किल्ल्यासमोरील वाळूच्या किनार्यावर पाणी भरायला सुरवात होते.
गडाच्या पूर्वेकडील महाद्वार आजही चांगल्या अवस्थेत आहे. यावर मोर, हत्ती, हरीण, वाघ आदी पशू-पक्ष्यांची चित्रे कोरलेली आहे. येथून आत गेल्यास आणखी एक दरवाजा लागतो आणि नंतर लगेच पुरातत्त्व विभागाचे कार्यालय आहे. तेथे ५ रु. चे नाममात्र शुल्क पर्यटकांकडून आकारले जाते. याच कार्यालयातील व्यक्ती आपल्याला भरतीच्या आधी केव्हा गेले पाहिजे, ते न चुकता सांगते. कारण येथे अनेकदा भरतीच्या पाण्यात पर्यटक वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. येथून पुढे श्रीपद्मावतीची घुमटी आहे. तर तिच्या किंचित दक्षिण बाजूस श्री गुलाबाई ऊर्फ महिषासुरीची मूर्ती आहे. येथूनच मळलेली वाट आहे ती पुढे गडदेवता श्री भवानीच्या मंदिरास जाते. हे मंदिर चांगल बांधलं असून, त्याच मंदिरात वेताळ व गणेशाची मूर्ती सुद्धा आहे. बाप्पुलाच गोड्या पाण्याची बारामाही विहीर आहे.
त्या वाटेनं तसंच पुढं गेलं की विस्तीर्ण अशी पुष्करणी लागते. जवळपास ३५ मी. ३८ मी. इतकी मोठी ही पुष्करणी आहे. गोड्या पाण्याचा हा किल्ल्यावरील सगळ्यात मोठा साठा. परंतु सध्या वापर नसल्याने त्यावर शेवाळ साचले आहे. पुष्करणी समोरच श्री गणेशपंचायतानाचे सुरेख असे मंदिर आहे. पंचायतन म्हणजे गणपतीशिवाय गाभार्यात इशान्येस श्रीदेवी, आग्नेयेस सूर्य तर मागील बाजूस शंकर व विष्णुमूर्ती आहे. याच पुष्करणीच्या मागील बाजूस आंग्रांच्या भग्न वाड्याचे अवशेष आहे. या वाड्यांना पाच आगी लागल्याची इतिहासात नोंद आहे. त्यातल्या दोन फार मोठ्या होत्या.
या किल्ल्याला एकूण सतरा बुरुज आहे. पण त्यांच्या नावात एकवाक्यता नाही. तसेच या किल्ल्याचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे मोठमोठे दगडाचे चिरे फक्त एकमेकांवर ठेवून याची उभारणी केली आहे. त्यात दुसरा कुठलाच पदार्थ नाही. शिवरायांच्या दुर्गबांधणीतला हा एक वेगळाच प्रयोग होता.
असा कुलाबा किल्ला एक वेळ समुद्रावर मराठ्यांचा असलेल्या वर्चस्वाचा साक्षीदार आहे."
आता सर्जेकोट पहायचा होता. या उपदुर्गचा वापर घोड्यांच्या पगेसाठी केला जायचा अशी माहिती मिळते. अर्ध्या तासात सर्जेकोटहि पाहून झाला. सर्जेकोटाच्या द्वाराजवळ थोडी विश्रांती घेतली. आमचा रवि (Being Ravi) याचेही फोटो सेशन झाले. हा गडी सलमान खानचा लय मोठा Fan. आता सर्वांच्या पोटात काव काव सुरु झाले होते. १०.३० वाजता गडफेरी उरकून सगळेजण मार्गस्थ झालो. पुन्हा गाडीत बसलो आणि अनिरुद्धच्या घरी परतलो. जेवणाची ओर्डर तयार झाली होती. अनिरुद्धच्या घरी जेवण पोहोचते झाले होते. जेवणाचा मेनू होता कोलंबी, तांदळाची भाकरी, भात आणि आम्हा शाकाहारी माणसांसाठी मस्त बटाटा वाटण्याची आमटी, भाजी, वरण आणि भात. आमची एक पंगत अनिरुद्धच्या Hall मध्ये बसली आणि दुसरी पंगत किचनमध्ये.
सर्वे पोटभर जेवले. जेवण उरकून थोडा आराम केला. काही गप्पा रंगल्या. अनिरुद्धने आंग्रे घराण्याचे वंशज रघूजीराजे आंग्रे यांची भेट घडवून देण्याचे सांगितले होते आणि ते स्वप्न त्याने पूर्ण केले. भेटीची वेळ मर्यादित असल्याने सर्वाना आवरते घेवून पुन्हा गाडीत बसण्यास सांगितले. ते राहत असलेल्या "घेरिया" या निवासस्थानी त्यांची भेट झाली. त्यांनी आंग्रे घराण्याच्या इतिहासावर तसेच किल्ल्यांच्या इतिहासाबद्दल सखोल माहिती दिली.
हि भेट आमच्यासाठी खूप अविस्मरणीय ठरली. त्यांचा निरोप घेवून जवळच असलेल्या हिराकोट या अपरिचित किल्ल्याला भेट दिली. सध्या हा किल्ला मिलिटरीच्या ताब्यात असल्याने बाहेरूनच पाहता येतो. सध्या याचा तुरुंग म्हणून वापर करण्यात येतो. किल्ल्याला लागून असलेल्या तलावाजवळून हा किल्ला पाहून झाला व मार्गी लागलो. आता भेट द्यायची होती ती कान्होजी आंग्रे याच्या समाधीस्थळाला. १० ते १५ मिनिटात आम्ही समाधीस्थळी पोहोचते झालो. समाधीच्या बाजूला कान्होजी आंग्रे यांचे स्मारक आहे. त्याला पुष्पहार घालून गारद दिली. समाधीस्थळाच्या बाजूला आंग्रे घराण्याच्या इतर वंशजांच्या देखील समाध्या आहेत. आजूबाजूचा सर्व परिसर सुशोभित आहे.
आता समाधीस्थळ पाहून झाले होते. सर्वजन गाडीत बसले आणि पुन्हा अनिरुद्धच्या घरी रवाना. घड्याळात १ वाजले होते. वेळ बराच होता म्हणून त्याच्या घरी गेल्यावर मुलांना कोर्लईगड करायचा का विचारले सर्वांचा होकार आला. लवकर निघून कोर्लईगड करायचा असल्याने अनिरुद्ध च्या आई-वडिलांना निरोप दिला (खरच त्याचे आई-बाबा खूप प्रेमळ आहेत). अनिरुद्ध सोबत पुन्हा सगळे गाडीत बसले आणि कोर्लईगडाच्या दिशेने गाडी रवाना झाली. अलिबाग पासून कोर्लईगड हा १८-२० किमी अंतरावर आहे.
जाताना एक घटना घडली, पुलाजवळ असलेल्या चौकीपाशी RTO वाल्यांनी गाडी अडवली. अलिबागच्या पुढे परमिट नसल्याने आमच्या driver ला ताब्यात घेतले. शेवटी संदीप दादा, शंकर बापू आणि सुशांत गुंड यांनी त्यांच्यासोबत केलेल्या वाटाघाटीतून driver ला सोडण्यात आले.
All India Permit असताना गाडी का अडवली असेल हा प्रश्न मला अजूनही पडला आहे. असो शेवटी म्हणतात ना "अलिबाग से आया हे क्या ?" आमचेही असेच झाले.
मुरुडकडे जाणार्या रस्त्याच्या उजवीकडे कोर्लई गाव लागते. पाऊण तासात आम्ही कोर्लई गावात पोहोचलो. गावात कोळी लोकांची वस्ती असल्याने गावात उतरल्यावर ती गंधवार्ता नाकात गेली. साऱ्या गावात प्रत्येकाच्या अंगणात उन्हाळी पापड वाळत घालावेत तसे मासे वाळत घातलेले होते. गावातूनच पायवाट कोर्लई किल्ल्याकडे जाते.
कोर्लई किल्ल्याचा थोडक्यात इतिहास असा :-
"अथांग सिंधुसागर आणि त्याला खेटून असलेल्या कोकणाच्या या चिंचोळ्या पट्टीवर राज्य करणाऱ्या राजसत्तांच्या अनेक जलदुर्गापैकी हा एक महत्त्वाचा दुर्ग! कुंडलिका खाडीच्या मुखाशी एका अंगाला हा कोर्लई तर दुसऱ्या बाजूला रेवदंडा! जणू कुंडलिकेचे हे दोन्ही द्वारपाल! त्यांना विचारल्याशिवाय या खाडीत प्रवेश मिळणार नाही.
पंडित महादेवशास्त्री जोशी त्यांच्या ‘महाराष्ट्राची धारातीर्थे’ या पुस्तकात लिहितात, ‘..कुंडलिकेने सिंधुसागराला आलिंगन दिले, त्या प्रीतिसंगमावरचा हा तीर्थोपाध्याय! पश्चिमेच्या डोंगराला नांगराच्या फाळासारखी जी एक तिरकस सोंड फुटली आहे, तिच्या टोकावर कोर्लई किल्ल्याची उभारणी झाली आहे. त्या बाजूला तोच एक डोळय़ांत भरतो. श्रीमंतीने किंवा डामडौलाने नव्हे, तर नि:संग निरासक्त वृत्तीने. त्यावर झाडांची हिरवळ नाही की दगडांची अडगळ नाही. भगवी छाटी पांघरून अनंताचे ध्यान धरून बसलेला जणू तो एक ज्ञानभिक्षूच!’
पंडित महादेवशास्त्री जोशी त्यांच्या ‘महाराष्ट्राची धारातीर्थे’ या पुस्तकात लिहितात, ‘..कुंडलिकेने सिंधुसागराला आलिंगन दिले, त्या प्रीतिसंगमावरचा हा तीर्थोपाध्याय! पश्चिमेच्या डोंगराला नांगराच्या फाळासारखी जी एक तिरकस सोंड फुटली आहे, तिच्या टोकावर कोर्लई किल्ल्याची उभारणी झाली आहे. त्या बाजूला तोच एक डोळय़ांत भरतो. श्रीमंतीने किंवा डामडौलाने नव्हे, तर नि:संग निरासक्त वृत्तीने. त्यावर झाडांची हिरवळ नाही की दगडांची अडगळ नाही. भगवी छाटी पांघरून अनंताचे ध्यान धरून बसलेला जणू तो एक ज्ञानभिक्षूच!’
या कोर्लई गावाचे या व्यतिरिक्तही आणखी एक वैशिष्टय़!
संस्कृत, मराठी, पोर्तुगीज, बंगाली, तुळू आणि उर्दू अशा अनेक भाषांच्या संकरातून कोर्लईच्या या बेटावर एका अनोख्या भाषेचा जन्म झाला, ‘नी लींग’! ‘नी लींग’म्हणजे आमची बोलीभाषा! कोर्लईची ही खास वेगळी बोलीभाषा! पोर्तुगीज भाषेचा प्रभाव असलेली, पण अन्य अनेक भाषांचे, त्यातील शब्दांचे संदर्भ घेत फुललेली ही अनोखी भाषा! यातले काही शब्द इंग्रजी, काही पोर्तुगीज, काही उर्दू तर काही चक्क आपल्या संस्कृत-मराठीतील! पण ही फक्त बोलीभाषा. यामुळे तिला स्वत:ची लिपी, व्याकरण असे काहीच नाही. गंमत अशी, की ही माणसे बाहेरच्या कुणाशी बोलू लागली की तुमच्या आमच्यासारखे मराठी बोलतात. पण त्यांच्यात एकमेकांशी बोलताना पुन्हा त्याची ही ‘नी लींग’ सुरू. त्यांना काही विचारले तर ते म्हणतात, ‘आमचं भासा पुर्तुगीज!’ पण खरेतर हे अगदी पोर्तुगीजही नाही. या वस्तीतले बरेचसे लोक ख्रिश्चन आहेत. त्यांचे धागेदोरे या पोर्तुगीज किल्ल्याशी जोडलेले असावेत. बहुधा त्यांच्या मूळ भाषेवर पुढे अनेक शतके वेगवेगळय़ा भाषांचे आक्रमण आणि संक्रमण होत यातून ही नवी मिश्र बोलीभाषा तयार झाली असावी. याच्याविषयी सखोल संशोधन होणे आवश्यक आहे. कोर्लई, कोरलई, कोरले अशा अनेक नावांनी इतिहासापासून ओळख सांगत आलेला हा जलदुर्ग! तीन बाजूंनी पाणी आणि एका बाजूने जमीन! यातील उत्तर दिशेने कुंडलिका खाडी, तर दक्षिण आणि पश्चिम दिशेला सिंधुसागराचा वेढा! पाण्याच्या या अगाध डोहात सहय़ाद्रीचे हे चुकार भूशीर इथे मध्येच समुद्रातून आकाशाकडे झेपावले आहे.
संस्कृत, मराठी, पोर्तुगीज, बंगाली, तुळू आणि उर्दू अशा अनेक भाषांच्या संकरातून कोर्लईच्या या बेटावर एका अनोख्या भाषेचा जन्म झाला, ‘नी लींग’! ‘नी लींग’म्हणजे आमची बोलीभाषा! कोर्लईची ही खास वेगळी बोलीभाषा! पोर्तुगीज भाषेचा प्रभाव असलेली, पण अन्य अनेक भाषांचे, त्यातील शब्दांचे संदर्भ घेत फुललेली ही अनोखी भाषा! यातले काही शब्द इंग्रजी, काही पोर्तुगीज, काही उर्दू तर काही चक्क आपल्या संस्कृत-मराठीतील! पण ही फक्त बोलीभाषा. यामुळे तिला स्वत:ची लिपी, व्याकरण असे काहीच नाही. गंमत अशी, की ही माणसे बाहेरच्या कुणाशी बोलू लागली की तुमच्या आमच्यासारखे मराठी बोलतात. पण त्यांच्यात एकमेकांशी बोलताना पुन्हा त्याची ही ‘नी लींग’ सुरू. त्यांना काही विचारले तर ते म्हणतात, ‘आमचं भासा पुर्तुगीज!’ पण खरेतर हे अगदी पोर्तुगीजही नाही. या वस्तीतले बरेचसे लोक ख्रिश्चन आहेत. त्यांचे धागेदोरे या पोर्तुगीज किल्ल्याशी जोडलेले असावेत. बहुधा त्यांच्या मूळ भाषेवर पुढे अनेक शतके वेगवेगळय़ा भाषांचे आक्रमण आणि संक्रमण होत यातून ही नवी मिश्र बोलीभाषा तयार झाली असावी. याच्याविषयी सखोल संशोधन होणे आवश्यक आहे. कोर्लई, कोरलई, कोरले अशा अनेक नावांनी इतिहासापासून ओळख सांगत आलेला हा जलदुर्ग! तीन बाजूंनी पाणी आणि एका बाजूने जमीन! यातील उत्तर दिशेने कुंडलिका खाडी, तर दक्षिण आणि पश्चिम दिशेला सिंधुसागराचा वेढा! पाण्याच्या या अगाध डोहात सहय़ाद्रीचे हे चुकार भूशीर इथे मध्येच समुद्रातून आकाशाकडे झेपावले आहे.
त्यावरच कोर्लईचा हा दुर्ग! या पर्वताला पूर्वी ‘चौलचा खडक’ असे म्हणत. चौल-रेवदंडय़ात राज्य करणाऱ्या पोर्तुगीजांना आपले राज्य सुरक्षित करण्यासाठी या पर्वतावर गड बांधण्याची गरज निर्माण झाली. त्यासाठी इसवी सन १५२९ मध्ये त्यांचे गव्हर्नर दि योगु लोपीश दि सिकैर याने तशी अहमदनगरच्या निजामशहाकडे परवानगी मागितली. यानुसार त्यांनी इथे ही माची, त्यावर त्यांच्या क्रुसाची बातेरी ऊर्फ सांताक्रुझची उभारणी केली. पण पुढे पोर्तुगीज आणि निजामशाहीचे बिनसले आणि किल्ल्याचे काम अर्धवट राहिले. पुढे पोर्तुगीजांचा वाढता धोका ओळखून निजामशहानेच १५९२ मध्ये इथे हा जलदुर्ग उभारला आणि त्याला ‘बुरहान दुर्ग’ असे नावही दिले. हे एवढय़ावरच थांबले नाही तर, १३ सप्टेंबर १५९४ रोजी या दुर्गावरूनच पोर्तुगीज आणि निजामशाहीत संघर्ष उडाला. यामध्ये निजामशाहीचा पराभव झाला आणि गडाचा ताबा पोर्तुगीजांकडे आला. पोर्तुगीजांचा हा कालखंड प्रदीर्घ असल्यामुळे या दुर्गाच्या स्थापत्यावरही मग त्यांचा प्रभाव पडला. शिवकाळातही हा गड त्यांच्याकडेच होता. ऑगस्ट १६८३ मध्ये छत्रपती संभाजीमहाराजांनी एकदा हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी ठरला. पुढे मार्च १७३९ मध्ये चिमाजी अप्पांनी शेजारच्या तळगडाचा हवालदार सुभानजी माणकर यांच्या मदतीने कोर्लई मिळवला आणि मराठय़ांचा जरीपटका गडावर फडफडू लागला. यानंतर इंग्रजांबरोबरच्या शेवटच्या युद्धापर्यंत हा गड मराठय़ांकडेच होता. ६ जून १८१८ रोजी इंग्रजांनी बळकावलेला हा जलदुर्ग अखेर स्वातंत्र्यानंतरच पुन्हा मोकळा श्वास घेऊ लागला.
दो कु टो नावाच्या एका पोर्तुगीज माणसाने या किल्ल्याचे तेव्हाचे वर्णन लिहून ठेवलेले आहे ते असे,.. ‘हा किल्ला खूपच खूपच भव्य असून त्यावर फक्त जमिनीकडूनच हल्ला चढविणे शक्य आहे. समुद्र आणि खाडी यांच्यामध्ये एक खंदक असून, त्याच्यावरील पूल काढला की किल्ला अभेद्य होतो. या खंदकाच्या आत भक्कम कोट असून त्याच्या प्रवेशद्वारावर एक भलामोठा ब्राँझचा सिंह आहे. त्याच्या खाली ‘माझ्याशी लढल्याशिवाय आत प्रवेश नाही’ अशा आशयाचा लेख आहे. किल्ल्याच्या माथ्यावर त्याचा बालेकिल्ला असून, त्याच्या शिखरावर एक गरुड पक्षी असून तेथेही ‘माझ्या तावडीतून उडणाऱ्या माश्यांशिवाय कुणाचीही सुटका नाही ’ असे दपरेक्तियुक्त वचन कोरलेले आहे.
दो कु टो नावाच्या एका पोर्तुगीज माणसाने या किल्ल्याचे तेव्हाचे वर्णन लिहून ठेवलेले आहे ते असे,.. ‘हा किल्ला खूपच खूपच भव्य असून त्यावर फक्त जमिनीकडूनच हल्ला चढविणे शक्य आहे. समुद्र आणि खाडी यांच्यामध्ये एक खंदक असून, त्याच्यावरील पूल काढला की किल्ला अभेद्य होतो. या खंदकाच्या आत भक्कम कोट असून त्याच्या प्रवेशद्वारावर एक भलामोठा ब्राँझचा सिंह आहे. त्याच्या खाली ‘माझ्याशी लढल्याशिवाय आत प्रवेश नाही’ अशा आशयाचा लेख आहे. किल्ल्याच्या माथ्यावर त्याचा बालेकिल्ला असून, त्याच्या शिखरावर एक गरुड पक्षी असून तेथेही ‘माझ्या तावडीतून उडणाऱ्या माश्यांशिवाय कुणाचीही सुटका नाही ’ असे दपरेक्तियुक्त वचन कोरलेले आहे.
कोर्लई गडाचा असा हा इतिहास! "
सध्या गावात व गडावर कोर्लई किल्ल्याच्या इतिहासाचा माहितीफलक नाही याचे वाईट वाटते.
गावातील घरे ओलांडत किनार्यावरून चालत चालत आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलो आणि किल्ला चढायला सुरुवात केली.
गडाच्या माथ्यापर्यंत यायला जेमतेम १५ मिनिटे लागतात. गडाला ३ वाटा आहेत पैकी दोन तळातील माचीकडून तर एक उत्तरेकडील कोर्लई गावातून. आम्ही माचीच्या मार्गाने गडाच्या महाद्वाराजवळ पोहोचलो. गडावर चार भक्कम बुरुज अजूनही शाबूत आहेत. तसेच प्रत्येक बुरजावर २-२ तोफा आहेत. जवळपास १५ ते २० तोफा गडावर आहेत. याशिवाय गडावर सैनिकांच्या खोल्या, दारूगोळय़ाचे कोठार, गडाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे प्रत्येक टप्प्याला विभागणारी एक अंतर्गत भिंत आणि दरवाजा. यातील काही दरवाजांवर पोर्तुगीज भाषेतील शिलालेखही आहेत. या लेखांशिवाय, वेगवेगळय़ा आकारांतील तोफा, पाण्याचे हौद, टाक्या, कोठारे, चर्च, महादेवाचे मंदिर, चौथरे असे एकेक दुर्गावशेष आहेत. गडावरून पलीकडे असलेला रेवदंडा किल्ल्यांची तटबंदी दिसते. तसेच कुलाबा किल्ला आणि सागरगड स्पष्ट दिसतो.
असा संपूर्ण परिसर पाहताना पोर्तुगीजांच्या पाऊलखुणा येथे दिसतात व त्यांचे दुर्गबांधणीचे शास्त्र सुद्धा लक्षात घेण्याजोगे आहे.
संपूर्ण किल्ला पाहायला आम्हाला २ तास लागले. घड्याळात ६ वाजले होते. तसे गडाच्या शेवटच्या टोकाकडून किल्ल्याच्या बाहेरून उजवीकडे वळसा घेत आम्ही गावाच्या दिशेने निघालो. सुर्यरावांची झोपायची वेळ झाली होती आणि आमचीही गडाला निरोप द्यायची वेळ झाली होती. हळू हळू मावळतीच्या सूर्याचे दर्शन घेत घेत काही ठिकाणी थांबत त्याच्या रंगछटा डोळ्यात आणि कॅमेऱ्यात बंदिस्त करत, कोर्लई किल्ल्याला, अथांग सागराला निरोप देत आम्ही मार्गी लागलो होतो.
या सह्याद्रीत मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा खूप काही साठवून घेवून जातो.. मग तो थरार असो.. सह्याद्रीचे सुंदर किंवा रांगडे रूप असो.. माना टाकलेल्या कमानी असो.. पडलेल्या बुरुजांचे दगड असो...माणसांचे स्वभाव असो.. सर्वकाही अनुभव या फाटक्या झोळीत घेवून जात असतो.. आणि झोळी फाटकी असल्याने पुन्हा सह्याद्रीत येत असतो तो अनुभव पुन्हा घ्यायला...
या सह्याद्रीत येताना खालील ओळी नक्की लक्षात ठेवा.
"हा सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच रौद्र आहे.
तो आधीच जाणवून देतो काय करावे नि काय न करावे.
मी तर एक शून्य त्यापुढे शेवटी तो माझा गुरु आहे."
ह्या लेखाच्या माध्यमातून गड किल्ल्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा माझा उद्देश. जेणेकरून गडकिल्ल्यांविषयी लोकामध्ये आवड निर्माण व्हावी. ट्रेकिंगच्या माध्यमातून का होईना त्यांना भेट देत चला.
तुम्हाला इतिहास ऐकायचा असेल तर त्या त्या गडांच्या चिरेबंदी बुरुजाला कान लावून ऐका.
"तुम्हाला आवाज येईल त्या आर्त किंकाळीचा. ..
तुम्हाला आवाज येईल खनाननाऱ्या तलवारीचा...
तुम्हाला आवाज येईल बुरुजावरून धडाडनाऱ्या तोफांचा..
तुम्हाला आवाज येईल त्या शूर मावळ्यांचा "हर हर महादेव..हर हर महादेव.. हर हर महादेव.. "
यासाठीच हा लेखनप्रपंच.
।। जय शिवराय ।।
- जातिवंत भटका
Comments
Post a Comment