सफर सप्तदुर्गांची भाग-१
रखरखते ऊन, चेहरा व मान करपवून टाकणारा सूर्याजीराव, घामाची होणारी लाही आणि पाण्याची बोंब करणारा मे महिना म्हणजेभटक्यांसाठी शापच म्हणावा लागेल. पण काहीजण त्याला अपवाद आहेतच. उन्हाळा असो वापावसाळा सह्याद्रीत भटकायची खाज असणाऱ्यांना सगळे ऋतू सारखेच. मागील एप्रिल महिन्यात अर्नाळा ट्रेक केल्यानंतर कुठे जायचे या निर्णयाला १0-१५ दिवस लागले.त्यात रामशेजचा ट्रेक रद्द झाला होता. काही मित्र लग्नसराई आणि गावाला मजामारण्यात बिझी होते.… त्यात माझे यावेळी एकटेच भटकून यायचे ठरले होते. पण काय सांगू अपने मुह मे कोई बात छुपतीच नही.. २५ तारखेला निल्याच्या लग्नादिवशी बकलोच. तरीही काहीजनानीच होकार दर्शवला आणि तुला रात्री सांगतो म्हणाले. रात्री सांगतो म्हणजे यांचा काही नेम नाही हे नक्की असते आणित्यांना रात्री पुन्हा फोन करून खाजवून अवदान आणण्याचा मीही प्रयत्न केला नाही..आमचा सह्यमित्र विक्रांतराव गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाला होता. मलाही तेवढेच हायसे वाटले. गड्याची bike होती ना.. ट्रेनची झनझट नव्हती कि वडापसाठी वाट पाहत बसायची गरज नव्हती. त्यात हा जॉन अब्राहमचा बापच (त्याच्यासोबत गाडीवर बसाल तेव्हा समजेल).. ठरल्यानुसार २६ मे सकाळी ६.५० वाजता विक्रांत माझ्याघरी दाखल झाला. घरातच चहा-नाश्ता करून स्वारी तयार झाली. बरोबर ७.१० ला गाडीला किक मारली आणि निघालो सफरीवर उत्तर कोकणातल्या किल्ल्यांच्या.
या सप्तदुर्गसफरीत सर्वप्रथम तारापूरचा किल्ला पाहायचा आणि मग मागे मागे येत बाकीचे किल्लेपाहायचे प्लाननुसार ठरले...
घरापासून तारापूरचे अंतर फक्त १३० किमी होते.. मुंबई अहमदाबाद national highway लागल्यावर विक्रांतमधला Biker जागा झाला.. ९०-१०० च्या स्पीडने आम्ही तारापूर गावात तीन तासात दहा सवादहाच्या सुमारास पोहोचलो.. किल्ल्याचा पत्ता शोधत शोधत कसेबसे त्याच्या महाद्वाराजवळ पोहोचलो. गेल्या क्षणी एक गोष्ट दिसली किल्ल्याच्या दरवाजाला कुलूपहोते. किल्ला पूर्णपणे बंदिस्त होता. आम्हा दोघांना किल्ल्याभोवती घुटमळताना किल्ल्यासमोर असलेल्या गिरणीतल्या मालकाने पाहिले. तो आमच्याजवळ येवून किल्ल्याचा तोडकामोडका इतिहास सांगू लागला. बोलता बोलता गिरणीतल्या त्याच्या केबिनमध्ये घेवूनगेला आणि तारापूर किल्ल्याची माहिती आलेला पेपर दाखवला. मलाही इतिहासाची खूप आवडआहे. पण कामाच्या व्यापामुळे वेळ मिळत नाही तरीही कोणी पर्यटक येथे आलाच कि मी त्यांना मला माहित असलेली थोडीबहुत माहिती सांगत असतो असे ते म्हणाले. एका गुजराती माणसाने दिलेली माहिती अनमोल होती. त्यांचे नाव "नाना गिरणवाला" असेसांगितले. किल्ल्याच्या बाहेर एका बंदिस्त झापेच्या आड एक घोड्बाव आहे ती त्यांनीआम्हास दाखवली. हि घोडबाव येणारे पर्यटक सहसा न पाहताच जातात असे ते म्हणतात. या घोडबाव ची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे घोडे पाणी पिण्यास येथ असत. या घोडबावच्या समोर तारकेश्वरचे मंदिर आहे यावरूनच गावाला तारापूर हे नाव पडले असावे. आताआम्हाला किल्ल्यात प्रवेश हवा होता. नानांनी किल्ल्याच्या मालकाकडे चावी आहेत्यांचे नाव "लिलाधर चोरघे" असे सांगितले.. किल्ल्याच्या डावीकडे एक वाटजाते त्या वाटेत येणारी तीन घरे सोडून किल्ल्याच्या मालकाचे घर आहे.. आम्ही गेलोतेव्हा घराचा दरवाजा उघडा पण आत कोणीच नव्हते. हाक मारून झाली.. थोडे घरात डोकावूनपाहून झाले. शेवटी शेजाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांनी सांगितले बाहेर गेले असावेततुम्ही पुढच्या घरात चौकशी करा.. डोक्याची भजी झाली होती च्यामारी हे चोरघे कुठेपळाले असतील ? निदान रविवारी तरी त्यांनी किल्ल्याचा दरवाजा उघडावा ? मालक असले म्हणून काय झाले ? मी आणि विक्रांतने त्यांच्याबद्दल स्तुतीसुमने उधळली.. शेजाऱ्यांनी सांगितल्याघरात चौकशी केली असता ते मैताला गेलेत असे उत्तर आले.. थोड्या वेळ थांबा येतीलचअर्ध्या तासात असा त्यांचा पुतण्या म्हणाला आणि निघून गेला. आमचा थोडा राग शांतझाला व त्यांच्याच दाराच्या चौथऱ्यावर जावून वाट पाहत बसलो.. विक्रांतचे एव्हाना२-३ स्टेटस टाकून झाले होते. १०.३० वाजले होते. जवळ पास ११ च्या सुमारास चोरघेकाका आले. मागील दाराने त्यांनी प्रवेश केला आणि तात्काळ चावी माझ्याकडेफेकली.(मैतावरून आले होते म्हणून शिवताशिवत नको..) मीही अलगद झेलली. जाताना बोललेचावी देवून जावा होsss ...
आता हातातकिल्ल्याची चावी आली होती. थोडा हुरूप आला होता.. किल्ल्याचा दरवाजा उघडला आणि आतप्रवेश केला..
एका तासातगडभ्रमंती पूर्ण झाली. गडाची संपूर्ण तटबंदी अजूनही शाबूत आहे. गडाच्या आत मालकानेफळबाग फुलविली आहे. आंबा , चिकू , नारळ आणि केळीचीमोठी झाडे आहेत.. सध्या फक्त मारुती मंदिर अस्तित्वात आहे.
महादरवाजाच्याआजूबाजूस पहारेकरयाच्या देवड्या आहेत. छतावर दगडी घुमट असून, बाजूच्या भितीत कमळे कोरलेली आहेत.
तारापूर हे गाव इ. स. १२८० मध्ये माहिमचा राजा भीम याने नाईक लोकांकडून घेतले. पुढे पोर्तुगिजांनी हे जिकले आणि तारापूरचा किल्ला जिकून त्याची पुनर्बांधणी केली. हा दुर्ग मराठ्यांकडे आला तो चिमाजी अप्पाच्या अख्त्यारीत. पण याची मजबूत बांधणी ही पोर्तुगिजांनी केली. काळ्या पाषाणात बांधलेल्या या जलदुर्गाला तीन बाजूंनी खंदक, तसेच ३५ फूट उंच व १० फूट रुंद तट बांधला. या बळकटीमुळे या जलदुर्गाला इतिहासात फार महत्त्व होते. इंग्रज अधिकारी डीकिन्सन याच्या एका पत्रात तो म्हणतो की, ‘उत्तर कोकणातील जलदुर्गात तारापूरएवढा बळकट किल्ला अन्य कोणताही नाही. चोरघे काकांनीसांगितलेल्या मराठ्यांनी केलेल्या तारापूरच्या रणसंग्रामाची माहिती सध्या गोळाकरतोय. कारण माझा पुराव्यांवर विश्वास आहे लोककथेवर नाही. मला माहिती मिळाल्यावरती लवकरच लोकापर्यंत पोहोचविण्याचा मानस असेल..
गडफेरी पूर्णकरून किल्ल्याला कुलूप लावले आणि चावी द्यायला मालकाकडे निघालो..
चोरघे काकांना चावी दिली.. त्यांनीही थोडी बहुत माहिती दिली. ते म्हणतात " वहीवाटानुसार किल्ल्याचे मालकी हक्क आमच्या पूर्वजांकडे आले तेव्हापासून आम्ही गडाची काळजी घेतोय.. मराठ्यांनी केलेल्या तारापूरची लढाई इतिहासात अमर आहे पण लोकांना माहितीनाही. आज किल्ल्यात जी झाडे लावली आहेत त्याच्याच मिळकतीवरून मी दरवर्षी किल्ल्याची डागडुजी करत असतो. पूर्वी आम्ही किल्ल्याला कुलूप वगैरे काही लावलेनव्हते परंतु गर्दुल्यांचा त्रास तसेच किल्ल्यातील दगड काही लोक घराचे चौथरेबांधण्यासाठी नेऊ लागले. यासाठी किल्ल्याचा वापर होवू लागल्याने आम्ही किल्लापूर्णपणे बंदिस्त करून टाकला जेणेकरून अश्या फालतू लोकांचा त्रास होणार नाही. किल्ल्याचा मालकी हक्क असला म्हणून काय झाले आम्हालाही इतिहास माहित आहे. माझेही पूर्वज किल्लेदार होते. तारापूरच्या लढाईत रक्त सांडलय त्यांनी… पण काही लोकांनी आमची बदनामी करण्याचा घाटच घातला आहे, कि हा चोरघे किल्ल्याची चावी देत नाही मनात असेल तरच तो राजी होतो वगैरे वगैरे… आता तर काही मंडळी पेपरातून, पुस्तकातून सर्रास बदनामी करत आहेत. एवढे बोलून त्यांनी मनमोकळे केले. हताश झालेल्या चोरघे काकांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.
अर्धा तास त्यांच्यासोबत इतिहासावर गप्पा मारून त्यांना निरोप दिला. समुद्राकडून दिसणारी तटबंदी आणि पोर्तुगीझानी जेव्हा या किल्ल्याचे बांधकाम केले तेव्हा लिहिलेला लेख शोधायला आम्ही निघालो… गडाभोवती थोड्यावेळ फिरल्यावर तो लेख सापडला तो चक्क स्मशानाकडील तटबंदीवर… चोरघे काका ज्याच्या मैताला जावून आले होते ते प्रेत अजून जळतच होते. माझ्या अवतीभवती प्रचंड धूर पसरला होता. मला आधीच खाज.. त्या लेखाचा फोटो काढल्याशिवाय मी जाईलच कसा.. नाकात सारा धूर जात असताना कसाबसा फोटो काढलाच आणि तेथून काढता पाय घेतला..
आणि विक्रांतने गाडीला किक मारली…
तारापूरमध्येपाहण्यासारखे:-
१) तारापूरअणुउर्जा प्रकल्प
२) तारापूरचाकिल्ला
३) विस्तीर्णसमुद्र किनारा
४) डॉ. होमी भाभायांचे जन्मस्थळ
कसे जाल :-
१) मुंबई-डहाणू लोकल सध्या सुरु झाली असल्याने बोईसर स्थानकात उतरून तारापुरला जाणाऱ्या ST बसेस आणि वडाप भेटतात.
२) गाडीने जात असाल तर मुंबई अहमदाबाद हायवेवरील मनोर नंतर येणाऱ्या चील्लार फाट्यावरून बोइसरलायावे व तेथून तारापूर गाठावे.
तारापूरहून निघायला आम्हाला १२.३० वाजले. पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली होती. वाटेत बोईसरला उतरून मस्त पावभाजी हाणली आणि एक दीड वाजता बोइसर सोडले.
आता पुढचे लक्षहोते शिरगावचा किल्ला.…
क्रमश:
Comments
Post a Comment