Skip to main content

प्रवास चंदेरीचा भाग-२



आता ठरलेल्या वेळेनुसार एकेकजण येत होते.. पुण्याहून राहुल, व्यंक्या , पंक्या अशी मिळून ७ जन येवून हॉटेलात जेवायला गेली होती.. हा हा म्हणता ३०- ४० जन आली.. तोपर्यंत travels पनवेलच्या ब्रिजखाली येवून उभी राहिली... मंचर येथून कोकणे बंधू डेपोत दाखल झाले.. मंग्याची आणि राजेशची मित्रमंडळी आली.. त्यात काही अनधिकृत मित्र सुद्धा हजर झाले.. पराग, ओमकार सारखे.. सर्वांना घेवून travels मध्ये बसवले. त्यात नेरूळहून संदीप दादां छोटा हत्ती घेवून निघाले.. सगळे जमायला १०.३० वाजले. काही सदस्य नवे असल्याने त्यांची घाई चालली होती. कितीला निघणार.. वेळ होतोय.. 
त्यात नाश्ताची सोय रामला करायला लावली होती. तो आणि विक्रांत खरेदीसाठी गेले होते. आणि हो एक सांगायचं  राहिलच माझ्या अनधिकृत यादीतल्या विठ्ठल गोरे यांचा फोन १० वाजता आला होता कि तोही येतोय. गडी स्टुडीओतून नुकताच निघाला होता व त्याला तसेच आबासाहेब आणि बापूला पनवेल मध्ये येण्यासाठी ११.३० तरी वाजणार हे निश्चित होते. येथूनच वेळेचे नियोजन फिसकटायला सुरुवात झाली. मी तर  अगदी भैसातून गेलो होतो. ही मंडळी त्यात प्रामुख्याने नाव घ्यायचे झाल्यास राम आणि संदीप दादा कधीच वेळेवर येत नाहीत. त्यामुळे आधी आलेल्या ट्रेकर्सना  पुढे घेवून जाने भाग होते. कारण खूप जन लांबचा प्रवास करून आले होते. पनवेलहून तामसई गावाचे अंतर १७ किमी असल्याने ३०-४० जणांना गावात घेवून जाणे व बाकीचे येईपर्यंत वाट पाहायचे ठरले. आम्ही निघतोच तोवर संदीप दादा छोटा हत्ती घेवून आले. पण अजून ३-४ जन यायचे असल्याने त्यांनी आम्हाला पुढे जाण्याचे सांगितले व त्यानुसार आम्ही १०.४५ वाजता तामसई गावची वाट धरली. १५-२० मिनिटात आम्ही गावात पोहोचलो. सार्वजन पटापट उतरले आणि Sack टाकून निवांत बाकीच्यांची वाट पाहत व काही जन आराम करत जमिनीवर पडले. गाव अगदी शांत होत. फक्त कुत्रे आणि आमच्या गलबलाटाचा आवाज सोडून सर्व काही शांत होत.  
दोन तीन दिवसापूर्वी नुकतीच पोर्णिमा झाल्यामुळे चंद्राचा प्रकाश चांगलाच पसरला होता. एकीकडे चंद्र आणि एकीकडे चंदेरी अगदी वेगळंच वातावरण तयार झाल होत. फोटोग्राफर मंडळीनी आपापले कॅमेरे बाहेर काढून तो क्षण टिपायला सुरुवात केली. थोड्या वेळात पाठून येणार्यांची विचारपूस करायला फोनाफोनी सुरु झाली. त्यात कळल कि ती रस्ता चुकली होती. मल्हारला रस्ता माहित होता म्हणून त्याला मागे ठेवले होते परंतु ह्या गड्याने भलतीकडेच गाडी नेली होती. बघता बघता १२ वाजले होते आणि मागे राहिलेल्यांचा पत्ता नव्हता. थोड्याच वेळात २ मोटारसायकली वरून राम, विक्रांत, दीपक, शंकर बापू आणि विठ्ठल गावात आले. संदीप दादांची गाडी यांच्या पाठोपाठ होती. परंतु गाडी चालविणारे जॉन अब्राहम होती. त्यामुळे हे कुठे गेले ते संदीप दादाला कळलेच नाही. पुन्हा फोनाफोनी सुरु झाली आणि कळल कि  ते गावापासून जवळच २ किमी च्या अंतरावर आहेत आणि गाडीला धक्का मारत येत आहेत. झाल.. कपाळावर हात मारून घेण्यापेक्षा काहीच करू शकत नव्हतो. गाडी बंद पडली होती.. लांबूनच गाडीला धक्का देत येणाऱ्या मंडळींचा आवाज येत होता..
घड्याळात १.१५ मिनिटे झाली होती. गावाच्या हद्दीवर बाजूला गाडी लावून एकदाचे सर्वेजन आले आणि सुटकेचा श्वास घेतला. सर्वाना insrtruction देवून झाल्यानंतर Count घेण्यात आला. आता ट्रेकला येणाऱ्या मुलांची एकूण संख्या ६८ झाली होती आणि माझ्या काळजात धडकी भरली होती. चंदेरीचा ट्रेक हा साधासोपा मुळीच नाही. त्यानुसार राम, आबा , विक्रांत , मोठा बापू , छोटा बापू , संदीप दादा , रुपेश, विठ्ठल आणि मी आपापली कामे वाटून घेतली. ट्रेक किंवा कोणतेही कार्य म्हटले  कि जबाबदारी आलीच आणि एकटा माणूस हि जबाबदारी पेलू शकत नाही. ती सर्वांनी घ्यावी लागते आणि पेलावी लागते. मुळात हा एक जंगल ट्रेक होता. रस्ते भरकटणे अपघात होणे याची शक्यता खूप असते. त्यामुळे प्रत्येकाला योग्य ती माहिती दिली.
सर्वांची नावे लिहिण्यात आणि माहिती देण्यात रात्रीचे २ वाजले होते. Lead करायला विक्रांत आणि विठ्ठल यांना पुढे केले. आणि या भटक्यांचा चंदेरीचा प्रवास सुरु झाला. ( वेळ २.३० मिनिटे)
एका मागोमाग एक असे शिस्तीने सर्वांनी गडवाट धरली आणि लगबगीण चालू लागले. नागमोडी वळणात असलेल्या या रानवाटेत अर्धा एक किमी पर्यंत थोड्या थोड्या अंतरावर गडवाटकरयाची रांग लागली होती. बहुदा सर्वांकडे torch असल्याने व त्यात ओमकार ने तर दुबईवरून imported torch आणल्याने १ मैलापर्यंत फक्त torch चा लखलखता प्रकाश, चंद्राचा प्रकाश आणि त्या लखलखत्या प्रकाशात लांबूनच दिसणारा चंदेरी असा अदभूत मिलाप घडून आला होता. 
"लख लख चंदेरी " असा इवेन्टवर दिलेल्या नावानुसार आमचा सह्याद्रीचा प्रवास सुरु झाला होता..

क्रमश:

Comments

Popular posts from this blog

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

शिवकालीन लिंगाणा - भाग १

भटकंतीचा भस्म्या लागलेल्याला आपली भटकायची भूक भागवण्याकरिता एखांद्या मुहुर्ताची गरज नसती. समोर आलेल्या हिंडायच्या प्रस्तावाप्रमाणं सारं काही manage करणं त्याला आपसुकच जमत असतं. माझ्या बाबतीत सांगायच तर २०१४ मध्ये अगदी  action trekking shoes फाटुस्तोवर फिरलो. घराकडं साहजिकच कमी लक्ष दिलं गेलं. म्हणून मग ठरिवलं या वर्षी जरा समतोल राखायचा आणि घराकडं जरा जास्त लक्ष द्यायचं. पण ते काय हाय समोरून जशी एखांदी सुंदर मुलगी जात असली तर कितीही पण केलेल्या माणसाचं तिच्याकडे आपोआपच लक्ष वेधलं जातं अगदी तसच एखाद्या भटक्याच लक्ष त्याच्या डोळ्यासमोर plan होत असणार्या भटकंतीकडं आपोआपच वेधलं जातं. २०१५ सुरू झालं होतं. समोरून लय प्रस्ताव येत होते. पण कसाबसा स्वत: ला आवरून मोह टाळला होता. जानेवारी संपायच्या मार्गावर होता. महिनाभर कुठं भटकायला न गल्यानं घरातले तसे खुष होते मात्र जवळच्या मित्रांचे टोमणे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. २४,२५,२६ तीन दिवस सुट्टी जोडून आल्यानं मनाची चलबिचल सुरू झाली होती. whatsapp वर सर्वांचे message यायला सुरवात झाली होती. "कुठं जाणार असशीला तर कळीव लेका", असे बरेचसे mes...