Skip to main content

प्रवास चंदेरीचा भाग-३



आता सगळेजण चंदेरी कडे मार्गस्थ झाली होती. सर्वात मागे मी, आमचा Being रवी (Real सलमान) , विकास चौधरी, आबा , शंकर बापू आणि संदीप दादा राहिलो होतो. कारण सर्वांच्या उद्या सकाळच्या नाश्त्याची शिदोरी आमच्याकडे होती. रामने घरातून  शिजवून आणलेली अंडी, तसेच ब्रेडचे पुडे एका खोक्यात्तून आणले होती. वजन जर जास्तच होत. दीडशे अंडी आणि पंचवीस ब्रेडचे पुडे मिळून खोक्याचे जवळपास १०-१५ किलोचे वजन झाले असावे. आम्ही हा नाश्त्याचा box एकेक करून घेणार होतो. परंतु रविने मीच घेतो हा box आणि तुम्ही माझी फक्त sack सांभाळा असे सांगितले. रवीने box उचलला आणि मार्गी लागला. वजनदार box  घेवून काही वेळातच रवि आमच्या थोडासा पुढे गेला. त्या भयाण जंगलात आता या शहरातील ६८ जनावरांचा आवाज घुमत होता. torch च्या लखलखाटात जंगल झगमगून गेले होते. अर्धा तासाच्या रपेटीनंतर आता चढ लागला होता त्यामुळे आता दमछाक होणार होती. आणि थोड्याच वेळात एक अघटीत घडल.. अचानक वरून दगडे येवू लागली. आम्ही घाबरूनच गेलो. त्यात पोरांचा कल्ला वाढला. शेवटी एका मागोमाग एक असे message पास होत गेले व कळले कि रवीच्या खांद्यावर असलेला box फाटला आणि सगळी अंडी उताराच्या दिशेने घरंगळत खाली आली.. त्यामुळे मुलांचे traffic jam झाले होते. मग एकेकाला पुढे जाण्यास सांगून मातीने माखलेली पण चांगल्या अवस्थेत असलेली अंडी गोला  करायला आम्ही सुरुवात केली. रवीला खूप वाईट वाटले पण त्यात त्याची काहीच चुकी नव्हती. प्रत्येक ट्रेकला असे अनुभव येणे साहजिकच असते. त्यामुळे या गोष्टींचा विचार करत न बसता जेवढी जमतील ती चांगली अंडी एका पिशवीत भरली आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. आम्हाला चांगलाच उशीर झाला होता. पुढची मंडळी गडावर पोहोचली होती. पण वाटेत कोण थांबलंय का कोणी थकलंय का ते पाहायला मी पटापट पाऊले टाकत पुढे झालो. एका rock patch जवळ विठ्ठल सर्वाना हात द्यायला थांबला होता तर विक्रांत खालच्या बाजूला मदत करायला उभा होता. तो patch चढताना निलेश चांगलाच घसरला पण विक्रांतने त्याला थोडक्यात सावरले. निलेशला किंचित खरचटले होते. तरीही तो निसरडा patch सर्वांनी पार केला.
चढ लागल्यामुळे आता थकवा जाणवत होता. दमछाक करणारी पायवाट कधी संपते असे सर्वाना वाटत होते. अश्विनी ताई तर जामच थकल्या होत्या. गौरी मुळे ज्यांचा हा पहिला ट्रेक होता त्यादेखील थांबत थांबत येत होत्या. रेणूका शेलार व गोरुले या एव्हाना गडावर पोहोचल्या होत्या. तर काहीजण मधेच विश्रांती घेत थांबले होते. मी कोण कुठे आहे त्याची चाचपणी करायला सर्वाना पाहत, आता जवळच आलो आहोत सांगत पुढे जात होतो. नीरज पवार, प्रवीण थोरात आणि मगदूम बंधू हळू हळू गडवाट चालत होते. सर्वच थकले होते. नंद्या आणि वैभव यांना गौरी मुळे यासोबत यावयास सांगितले कारण त्या एकट्याच मागे होत्या. संदीप दादा , आबा , शंकर बापू , अश्विनी राम आणि विक्रांत सर्वात मागे होते तेदेखील दम खात येत होते. विठ्ठल आणि मी काही वेळातच गडावर असलेल्या गुहेजवळ येवून पोहोचलो. बघतो तर काय गुहेत झोपायला जागा नव्हती. अर्ध्याजनांनी  गुहेच्या बाहेरच अंथरून टाकून पाय पसरले होते. कारण आमच्या आधी २५ जणांचा एक ग्रुप येवून पोहचला होता. तरीही आमची ३०-३५ जन गुहेत घोरत पडली होती. घड्याळात ४.३० वाजले होते. त्यामुळे झोपून काहीच फरक पडणार नव्हता. छोटा बापू जागा होता. आम्ही तिघांनी गप्पा मारत दिवस उजाडायची वाट बघायची असे ठरवले. थोड्याच वेळात मागे राहिलेले सर्वजण आले आणि जागा मिळेल तिथे पहुडले. तर काही आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाले.
हाहा म्हणता तांबड फुटायला सुरुवात झाली. आकाशात भगवी लकीर दाटून येत होती. त्यात गुलाबी थंडी आणि सह्याद्रीचा गार वारा याचा सुखद अनुभव घेत होतो. 
बघता बघता घड्याळात ७ वाजल्या होत्या. सर्वाना Wake up call दिला. नि मी, विक्रांत, विठ्ठल आणि बापू rock patch ची पाहणी करून आलो. तोपर्यंत सगळ्यांची आवरावर चालू झाली होती. काहीजणांचा क्लिकक्लीकाट (केमेरयाचा) सुरु झाला होता, काही दात घासत होते, काही तोंड धुवत, तर काही नैसर्गिक विधीसाठी गेले होते. गडावर आलेल्या दुसऱ्या ग्रुपच्या लीडर सोबत चर्चा केली आणि त्याने आधी जाण्याचे ठरवले. काही वेळातच ते climbing साठी पुढे रवाना झाले. ८ ते ८.३० च्या दरम्यान सर्वाना एकत्र बोलावून पुन्हा माहिती दिली. एकेमेकांची ओळख करून देण्यात आली. रात्री घडलेला प्रसंग सर्वाना सांगण्यात आला. आता सर्वांनी घरातून आणलेली थोडी थोडी शिदोरी बाहेर काढली व "मिल बाट के खायेंगे" या नारयासारखे  सकाळचा नाश्ता करण्यात आला. सर्वांनी भरपेट नाश्ता केला आणि ९ वाजता climbing spot च्या दिशेने आम्ही निघालो. त्या दिशेला जाणारा मार्गही खडतर आहे. निसरडी पायवाट असल्याने रोप anchor केला आणि टप्प्या टप्प्यावर एकेकजण मार्गदर्शनासाठी ठेवला. सर्वांनी तो खडतर मार्ग  पार केला व climbing spot च्या ठिकाणी दाखल झालो. वर गेलेला ग्रुप आता खाली येत होता आणि तो आल्यानंतर आम्ही चढाईला सुरुवात करणार होतो. त्याप्रमाणे आम्ही २५-२५ जणांचा ग्रुप केला कारण अवघड प्रस्तरारोहण होते. विठ्ठल आणि विक्रांतने अर्ध्यावर असलेल्या झाडाला रोप anchor केला व चढाईला सुरुवात केली. आता खरी मेहनत आणि धाडस इथे होते. 

चंदेरीला फारसा इतिहास नाही परंतु एक टेहळणी दुर्ग म्हणून शोभतो. एका बाजूला कल्याण आणि एका बाजूला पनवेल या दोन्ही तालुक्याच्या सीमाभागावर हा गड उभा आहे. प्रबळगडाच्या रक्षणासाठी चांदेरीबरोबरच, पेब (विकटगड), मलंगगड , इरशाळगड , माणिकगड आणि कर्नाळा या गडांची निर्मिती करण्यात आली असावी. गडावरून हे सर्व किल्ले स्पष्ट दिसतात. तसेच नवरा नवरी, म्हैसमाळची डोंगररांग, भिमाशांकारची डोंगररांग आणि माथेरान देखील पहावयास मिळते. गडावर शिवरायांची ३-४ फुट उंच अशी सिंहासनावर आरूढ झालेली मूर्ती आहे. पाण्याची दोन-तीन टाकी, महादेवाचे मंदिर असलेली गुहा आणि निसर्गनिर्मित तटबंदी येथे पाहण्यास मिळते. हा दुर्ग प्रस्तरारोहण कलेची आवड असणार्‍या ट्रेकर्स साठी खास आकर्षण आणि आव्हान आहे.
जवळपास ४२-४५ जन चढाईला तयार झाले होते तर बाकीचे खाली थांबले होते. त्यात मंग्याहि होता त्याने खालूनच आमचे फोटो काढत धन्यता मानली.   त्यानुसार हळू हळू आम्ही ११.३० च्या दरम्यान गडाच्या माथ्यावर पोचते झालो. राहुलने त्याच्या पहाडी आवाजात जोरदार अशी गारद दिली. ती पण एकदा नाहीतर दोनदा. आता सूर्य डोक्यावर आला होता आणि प्रत्येकाची उतरताना जीरणार होती हे खरे. आता उन्हाचे भयाण चटके बसू लागले होते. कातळ तापले होते. लवकरात लवकर खाली उतरणे गरजेचे होते. त्यानुसार १२.३० वाजता आम्ही तो कातळमाथा उतरायला सुरुवात केली. दोघात अंतर ठेवत सावकाश पाय आणि हात ठेवीत एकेकजण गड उतरू लागला. विठ्ठल त्या झाडाखाली जिथे आम्ही रोप anchor केला होता त्या ठिकाणी पुन्हा मार्गदर्शनाचे काम करू लागला. जवळपास एक ते दीड तासात सर्वजण खाली सुखरूप उतरले. पाण्याच्या बाटल्या भरल्या आणि पुन्हा गुहेकडे निघालो. सर्वजण गुहेजवळ आल्यानंतर pack up ची घोषणा केली. पुन्हा एकदा count घेण्यात आला. तेव्हा २ जन गायब होते असे कळले. मंचरहून आलेले दोघे कोकणे बंधूनि काही अचानक काम आल्यामुळे (आमचेही चुकलेच कारण वेळेचे नियोजन फिसकटले होते) बाकीच्यांना निरोप देवून परतीचा प्रवास सुरु केला होता. असो..

आता माझ्यासकट सगळेजण दमले होते. त्यात उन्हामुळे अंगाची लाही लाही झाली होती आणि पोटात कावळे ओरडून ओरडून गप्प बसले होते. कारण जेवणाची सोय गावात केली होती. सर्वाना इशारा दिला पंक्याला लीड करायला सांगितले आणि परतीच्या प्रवासाला लागलो..
चंदेरीचा हा प्रवास सुखाचा झाला होता. गावात आल्यावर सगळे पोटभर जेवली. आम्ही निवडलेल्या मार्गाने सहसा कोणताही ट्रेकर्सचा ग्रुप प्रवास करत नाही असे गावातल्याच व्यक्तींकडून कळले होते. त्याचा अभिमान वाटतो. त्यांनी जेवणाची खूप चांगली व्यवस्था केली होती. या संपूर्ण खडतर प्रवासात कोणालाही इजा किंवा दुखापत झाली नव्हती. याला अपवाद फक्त राजेश.. त्याला गावाजवळ आल्यानंतर dehydration चा थोडा त्रास झाला. ह्या संपूर्ण प्रवासात आबासाहेब कापसे, राम गिड्डे , संदीप वाडकर , विक्रांत गायकवाड , बापू पवार , शंकर सापते, विठ्ठल गोरे, राहुल यासहीत संपूर्ण गडवाट परिवाराची साथ लाभली. तब्बल ६८ जन या सह्यभ्रमंती मध्ये सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या सर्वांची नावे एकदम आठवत नाहीत पण सर्वासोबत हि सह्यभ्रमंती करायचा अनुभव वेगळाच होता. 

अजून खूप लिहिले असते परंतु येथेच आज्ञा द्यावी..

या सह्याद्रीत मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा खूप काही साठवून घेवून जातो.. मग तो थरार असो.. सह्याद्रीचे सुंदर किंवा रांगडे रूप असो.. माना टाकलेल्या कमानी असो.. पडलेल्या बुरुजांचे दगड असो...माणसांचे स्वभाव असो.. सर्वकाही अनुभव या फाटक्या झोळीत घेवून जात असतो.. आणि झोळी फाटकी असल्याने पुन्हा सह्याद्रीत येत असतो तो अनुभव पुन्हा घ्यायला...

या सह्याद्रीत येताना खालील ओळी नक्की लक्षात ठेवा. 
"हा सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच रौद्र आहे.
तो आधीच जाणवून देतो काय करावे नि काय न करावे.
मी तर एक शून्य त्यापुढे शेवटी तो माझा गुरु आहे."

ह्या लेखाच्या माध्यमातून गड किल्ल्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा माझा उद्देश. जेणेकरून गडकिल्ल्यांविषयी लोकामध्ये आवड निर्माण व्हावी. ट्रेकिंगच्या माध्यमातून का होईना त्यांना भेट देत चला.
तुम्हाला इतिहास ऐकायचा असेल तर त्या त्या गडांच्या चिरेबंदी बुरुजाला कान लावून ऐका.
"तुम्हाला आवाज येईल त्या आर्त किंकाळीचा. ..
तुम्हाला आवाज येईल खनाननाऱ्या तलवारीचा... 
तुम्हाला आवाज येईल बुरुजावरून धडाडनाऱ्या तोफांचा..  
तुम्हाला आवाज येईल त्या शूर मावळ्यांचा "हर हर महादेव..हर हर महादेव.. हर हर महादेव.. " 
यासाठीच हा लेखनप्रपंच.

।। जय शिवराय ।।

- जातिवंत भटका

Comments

Popular posts from this blog

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

शिवकालीन लिंगाणा - भाग १

भटकंतीचा भस्म्या लागलेल्याला आपली भटकायची भूक भागवण्याकरिता एखांद्या मुहुर्ताची गरज नसती. समोर आलेल्या हिंडायच्या प्रस्तावाप्रमाणं सारं काही manage करणं त्याला आपसुकच जमत असतं. माझ्या बाबतीत सांगायच तर २०१४ मध्ये अगदी  action trekking shoes फाटुस्तोवर फिरलो. घराकडं साहजिकच कमी लक्ष दिलं गेलं. म्हणून मग ठरिवलं या वर्षी जरा समतोल राखायचा आणि घराकडं जरा जास्त लक्ष द्यायचं. पण ते काय हाय समोरून जशी एखांदी सुंदर मुलगी जात असली तर कितीही पण केलेल्या माणसाचं तिच्याकडे आपोआपच लक्ष वेधलं जातं अगदी तसच एखाद्या भटक्याच लक्ष त्याच्या डोळ्यासमोर plan होत असणार्या भटकंतीकडं आपोआपच वेधलं जातं. २०१५ सुरू झालं होतं. समोरून लय प्रस्ताव येत होते. पण कसाबसा स्वत: ला आवरून मोह टाळला होता. जानेवारी संपायच्या मार्गावर होता. महिनाभर कुठं भटकायला न गल्यानं घरातले तसे खुष होते मात्र जवळच्या मित्रांचे टोमणे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. २४,२५,२६ तीन दिवस सुट्टी जोडून आल्यानं मनाची चलबिचल सुरू झाली होती. whatsapp वर सर्वांचे message यायला सुरवात झाली होती. "कुठं जाणार असशीला तर कळीव लेका", असे बरेचसे mes...