Skip to main content

Posts

Showing posts from 2013

एक रात्र..तीन मित्र आणि सह्याद्रीची कूस.. इरशाळगड ते प्रबळगड..

एक रात्र..तीन मित्र आणि सह्याद्रीची कूस.. इरशाळगड ते प्रबळगड.. एखादा रविवार सुटला कि आठवडाभर मन लागत नाही. अचानक भटकंती वाली मेंबर फोन करून सांगतात उद्या निघायचं. बर आमची bag काय तय्यार असतेच. तर ठरल्याप्रमाणे मी आणि माझे भटके जिवलग सुहास आणि विठ्ठल ६ वाजता संध्याकाळी पनवेल डेपोत आलो. तिथे कडकडून भूक लागली म्हणून पनवेल प्रसिद्ध ' वाघेज ' ची पावभाजी वो भी मस्का डालके..!! हादडली आणि इरशाळगड कडे S.T प्रवास सुरु केला . रात्री गावातून जाताना ' एवढ्या रात्री जाणार..?? ' या गावकर्यांच्या प्रश्नांनी मात्र कंटाळा आणला राव. शेवटी गाव ओलांडून आणि इरशाळवाडी च्या थोड मागे एका टेकडीवर आम्ही आमचा पहिला पडाव टाकला. एक झकास दगड...तीन जन आरामात झोपू शकतो असा natural bed होता. तिथून आकाशात दिसणारा चंद्र (नुकतीच पौर्णिमा झाली होती) आणि खाली तुडूंब भरलेल मोरबे धरण आहा काय नजारा होता... तिथे आम्ही खूपच आराम केला म्हणजे गप्पाच तश्या रंगल्या.. अगदी बालपणापासून ते महाविद्यालयीन जीवनावर आणि मित्रांपासून शत्रुंपर्यंत सगळ... शेवटी ४ च्या सुमारास पावलं पुन्हा हलली आणि इरशाळवाडी कडे प्रस्थान के...

कळसुबाई - एक उंचीचा दिवस..

आमच्या पायाला घरी थांबवत नही आणि मन तर २४ तास सह्याद्रीच्या डोंगर-दर्यात आणि नदी-वार्यावर फिरत असत. त्यात एखादा रविवार सुट्टी घेण म्हणजे आयुष्याचे नुकसानच. असो. सह्यगिरि रांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ' कळसुबाई ' ( तस कळसुबाई दुसर्यांदा ) म्हणजे सोन्याहून पिवळ. ठरल...ठरल..ठरल... अनेक अडचणी नंतर रात्री अखेर गाड्वाटची बस पकडली. प्रवास करत नाशिक महामार्गावरून बारी गावाच्या वेशीवर आलो. कमानी खाली बस उभी केली आणि गावात शिरलो. मी सुहास आणि विठ्ठल.. काय रस्ता..भारीच.. कोणी ' गोरक्ष ' कडे व्यवस्था केली होती. बर आमची आणि त्या गावच नशीब थोर म्हणून कि काय त्या गावात प्रत्येक घरात एक ' गोरक्ष ' नावाचा माणूस.. सगळ गाव कोंबड्याच्या आधी आम्ही जाग केल... " कोण आहे का..?? गोरक्ष इथेच राहतात का.? " मग फुल पोझ मध्ये आतून पुरुष उठून येणार... ' कोन..ते गोरक्ष का..? कंच्ये..? खाडे कि आडार..?? ' हा ते तिकड खाली राहतात..जावा तिकड..' हे अस.. शेवटी तो गोरक्ष काही भेटला नाही. परत आलो बस जवळ. बाहेरच बसून आभाळ न्याहळत.. चंद्राची कोर जणू १६ वर्षाच्या तरुणी प्...

आमचा P2V ट्रेक

आमचा P2V ट्रेक कसय शीर्षक ??? P2V म्हंजे पन्हाळा ते विशालगड बर का…! लयीच Modern आणि short  नाव दिलंय… त्याचप्रमाणे थोडक्यात लिहितोय…  घड्याळाच्या काट्यावर चालणारा मी चाकरमानी माणूस… घ्या समजून… :P तर जूनमधे या ट्रेकचा प्लान झाला… ऑगस्ट महिन्याची ९-११ तारीख ठरली.   हा हा म्हणता दिवस उजाडला… मुंबई, पुणे, सातारा, चंद्रपूर, सोलापूर, तुळजापूर हून आलेली अशी ५९ जन सकाळी ९ च्या सुमारास गडावर दाखल झाले. अंघोळ, चहापाणी उरकून गडावर असणाऱ्या शाळेत सार्वजन हजर झाले.. पन्हाळ्यावर एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता. ११ च्या सुमारास मान्यवरांचे जल्लोषात आगमन झाले…सत्कार झाला….  संभाषण झाले… उशिरा का होईना कार्यक्रम थाटामाटात उरकला…. Counting झाली…. सूचना झाल्या…. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी भगवा दाखवला आणि ट्रेकला सुरुवात झाली… पन्हाळा ते विशालगड तब्बल ६५ ते ७० किमीचे अंतर दोन दिवसात पार करायचे होते. त्यातला अर्धा दिवस सरला होता… मुक्कामाचे गाव पन्हाळ्यापासून अदमासे २८-३० किमी वर होते.…रस्त्यात जेवणाच्या पिशव्यांचे वाटप झाले… पवनकुमार निपाणीकर यांनी आघाडी घेतली…. ...

विकट वाटेने विकटगड (पेब) भाग-२

मालडूंगे गावातून अर्ध्या तासातच कोंबलटेकडीत पोचते झालो. बाळूला सोबत घेतला आणि पुन्हा मार्गी लागलो. गड स्पष्ट दिसत होता. एका डोंगराला वळसा मारून पेबच्या किल्ल्यावर जाण्याचा येथून सोपा तसाच कठीण मार्ग आहे. पावसाने पुन्हा वर्दी दिली. भिजत भिजत जंगलात शिरलो. वाटेत २ धबधबे लागले. आमची वाट त्यावरूनच जात होती. एकमेकांना आधार देत सर्वांनी धबधबे मागे सारले. तजेलदार वातावरण, फेसबुकवरले विनोदी स्टेटस, ट्रेकच्या गप्पा तर काही इतिहासाच्या गप्पा मारत जंगलातील वाट तुडवत चालत होता. मधेच कोणी तरी दमायचा आणि मागे राहायचा. मग आले रे जवळ चाल पटपट करत एकेकाला पुढे ठेवायचो. विशाल, रवींद्र आणि दिनेशमधला फोटोग्राफर जागा झाला होता. आडवेतिडवे भन्नाट फोटू काढत तेही चालत होते. एका तासात गडावर पोचते झालो. गुहेच्या अलीकडेच म्हणजेच शिडीच्या तोंडावर हि वाट आणून सोडते. पाऊस आणि वर काय शांत झाला नव्हता. नेरळहून आलेले ट्रेकर्सनी शिडीच्या बाजूला चांगलीच गर्दी केली होती. कसेबसे वाट काढत गडवाट फर्स्ट करत आमच्या पोरांनी शिडीवर ताबा मिळवला. शिडी चढताना गडाच्या भिंतीवरून पडणाऱ्या पाण्याने ...

भटकंती...

कुणासाठी वेळ जात नाही म्हणून तर कुणासाठी हौस म्हणून... कुणासाठी तो जातो म्हणून तर कुणासाठी मनोरंजन म्हणून.. पण आम्ही भटकतो ते आमच्यासाठी, आम्ही जगतो आमच्यासाठी, कारण आम्ही या निसर्गाच्या भव्यतेच देण लागतो. इतरांना चहाच्या झुरक्याबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलण्यात रस असतो पण आम्हाला मंद चहाच्या वाफेवर डोंगरांची गार हवा अंगावर घ्यायला आवडत , कुणाला AC गाड्यांमध्ये कोंक्रेंटी रस्ते पार करण्यात मोठेपणा आहे पण आम्हाला मोकळ्या पायांनी जंगल आडवाटा तुड़वण्यात मजा आहे. आम्ही साधे सरळ म्हणून नाही किंवा आर्थिक परिस्थिती बेताची म्हणून तर मुळीच नाही ' आमचा जीव राहतो या दर्याखोर्यात , आमचा श्वास वावरतो या जंगलात , आमची नजर भटकते या कातळ ताशिव कड्यावर आणि आमचे ह्रदय धड़कत या सागरी लाटांवर ' आणि काय म्हणून सांगू. आम्ही भटकतो निसर्गाच्या शाळेत , आम्ही शिकतो , आपल्या परिन आकलन करतो आणि जीवनाचे नविन सिद्धांत मांडतो. म्हणून आम्ही भटकतो आणि ' जातिवंत भटके ' म्हणवून घेतो..

विकट वाटेने विकटगड (पेब) भाग-१

पावसाळा आला म्हटले कि सह्याद्रीत भटकायला निसर्गप्रेमींची विकेंडला झुंबडच्या झुंबड लोणावळा, खंडाळा, माथेरान, महाबळेश्वर सारख्या निसर्गाने समृद्ध अशा ठिकाणी पाहताना मिळते. धो धो पडणारा पाऊस, उंचच उंच कड्यावरून खळखळत कोसळणारे शुभ्र धबधबे, हिरवागर्द शालू पांघरलेला सह्याद्री, गर्द धुक्याने वेढलेले डोंगरदरे, गडकिल्ले, रानवाटा पायी तुडवताना येणारा अनुभव रोजच्या धकाधकीच्या जीवनातला थकवा दूर करतो. अशातच आमच्यासारख्या शहरातील भटक्यांसाठी जवळपासचे गडकिल्ले साद देतात. मग प्लान ठरतो. कुठे?  कधी? किती वाजता ? सगळ काही नियोजनपूर्व फेसबुकवर ठरते. फोनाफोनी होते. ट्रेकच्या वेळेत कोण उशिरा येते तर कोण टांग देते. सगळे एकत्र आले रे आले कि नाश्ता पाणी उरकनेका आणि ST किंवा वडाप पकडनेका ठरलेले असते. सर्वांचे मिटिंग स्पॉटसुद्धा ठरलेले असतात. मोठ्या फुशारकीने सकाळी ट्रेकला आलेले टवटवीत चेहरे ट्रेक संपल्यावर संध्याकाळच्या वेळेत खड्डे खोडून आलेल्या माणसावाणी होतात. "बोलते हे ना कुत्तेकी शेपूट पाईप मे डालो किंवा काठी से बांधो वाकडी ती वाकडीच रह...
त्रिंगलवाडी ट्रेक भाग-२ गडाच्या दिशेने चालायला लागलो तसा ढगोजीरावांनी एकत्र येवून बरसायला सुरुवात केली. मस्त पावसात भिजत रानातून असलेल्या वाटेवर चालत एकेकजण पुढे पुढे जात होता. वाटेच्या कडेने भाताची पिके हिरवळीने सजली होती तर कुठे शेतकऱ्यांची बैलजोडीसोबत नांगरट चालू होती. साखरेच्या वासाने मुंग्या जश्या एकामागे एक चालत वाट काढत त्या साखरेला भिडतात तसे आम्ही गडाच्या दिशेने चाललो होतो. किल्ल्याचा इतिहास एवढाच वाचनात येतो कि किल्ल्याच्या पायथ्याशी असणाया जैन लेण्यांवरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १०व्या शतकात झाली असावी. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ऐकिवात नाही. पण १६८८ च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. गडाच्या पायथ्याशी दहाव्या शतकात खोदलेली जैनधर्मीय गुहा लागली सध्या तिला पांडवलेणी असे म्हणतात. गुहेच्या गाभाऱ्यात भगवान गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती आहे (यवनी सत्तांनी केलेल्या आक्रमणात याही मूर्तीची विटंबना झाली आहे). गुहेत असलेल्या चार खाम्बापैकी ३ खांब पडले किंवा पाडले आहेत. एकाच खांब सध्या सुस्थितीत आहे. हि गुहा प्रशस्त असून येथील म...
त्रिंगलवाडी ट्रेक भाग- १ त्रिंगलवाडी… नाव ऐकूनच काही नवे ट्रेकर्स अचाट पडतात. पण गुगल, पुस्तके आणि इतर मित्रांकडून हा एक किल्ला आहे अशी माहिती त्यांना मिळत जाते. येथे कधी जायचे कोणत्या मार्गाने जायचे आणि कोणत्या हंगामात जायचे हे ठरवत एकदाचा तो ट्रेकर जावून येतोच. धुक्यांची नगरी इगतपुरीपासून १०-१५ किमी अंतरावर हा किल्ला आहे. पावसाळ्यात इथला निसर्ग या शहरावर भरगोस कृपादृष्टी दाखवतो. आपला हिरवाकंच शालू सह्याद्रीवर पांघरतो आणि धुक्यांनी ओढून लोकांची नजर चुकवितो.  इगतपुरी शहरालगत खूप गडकिल्ले पाहण्यासारखे आहेत त्यातलाच एक त्रिंगलवाडीचा किल्ला.  गडवाटची या पावसाळ्यातील हि पहिलीच गडभ्रमंती….दरवेळी प्रमाणे यावेळी देखील नवी जुनी मित्र मंडळी ट्रेकसाठी इच्छुक झाली… आमचा वैभ्या, पराग मोहिते, जोतीराम सारख्यांनी ऐनवेळी टांग दिली. तर लोभ्या, रविभाऊ शेडगे , सिद्धेश, मंगेश , शंकर बापू यांना खूप Miss केलं. पुण्याहून विशाल आणि रवि आदल्या दिवशीच इगतपुरीत मुक्काम ठोकून होते. "औरंगाबाद नाही संभाजीनगर म्हणा" इथून प्रतिक, अभिनव, रुपेश, नितीन व प्रशांत यांची Gang रविवारी सकाळी निघाली ...
सफर सप्तदुर्गांची भाग-२ सकाळपासून आभाळ दाटलेलं होत. ढगोजीचे सैनिकांनी सुर्याजीरावास वेढा दिला होता त्यामुळे हवेत थोडासा गारवा निर्माण झाला होता. पण दुपारी १२.३० नंतर ढगोजीरावांच्या सैनिकांना नेस्तनाबूत करून सुर्याजीरावांनी लढाई जिंकली. जोरदार उन लागायला सुरुवात झाली होती. बोइसर ते शिरगावचे अंतर ११ किमी इतके आहे. बोइसर रोडवरून पालघर गावाच्या चौकात पोहोचल्यावर उजवीकडे वळावे. तो रोड थेट माहीम - केळवे- दांडा या गावांकडे जातो. २-३ किमी पुढे गेल्यानंतर पुन्हा एक फाटा लागतो तो शिरगावला जातो. त्या दिशेने वाट धरावी.. बोइसरहून शिरगावात पोहोचायला आम्हास ३० मिनिटे लागली. गावात गेल्यावर किल्ल्यावर जाणारा रस्ता विचारत आम्ही एकदाशी किल्ल्याजवळ पोहोचलो. समुद्र किनाऱ्याला लागुनच शिरगावचा किल्ला आहे.. गेल्या क्षणीच किल्ल्याच्या मुख्यद्वारावर असलेल्या दोन कमानी/मनोरे लक्ष वेधून घेतात. मी अजूनपर्यंत इतर किल्ल्यांवर अश्या कमानी पहिल्या नव्हत्या. टेहळणी साठी यांचा वापर केला जात असे.. किल्ल्यात प्रवेश करायच्या आधी भिंतीवर एक माहिती लिहिली होती ती म्हणजे "किल्ल्यात शौचालय...
सफर सप्तदुर्गांची भाग-१ रखरखते ऊन, चेहरा व मान करपवून टाकणारा सूर्याजीराव, घामाची होणारी लाही आणि पाण्याची बोंब करणारा मे महिना म्हणजेभटक्यांसाठी शापच म्हणावा लागेल. पण काहीजण त्याला अपवाद आहेतच. उन्हाळा असो वापावसाळा सह्याद्रीत भटकायची खाज असणाऱ्यांना सगळे ऋतू सारखेच. मागील एप्रिल महिन्यात अर्नाळा ट्रेक केल्यानंतर कुठे जायचे या निर्णयाला १0-१५ दिवस लागले.त्यात रामशेजचा ट्रेक रद्द झाला होता. काही मित्र लग्नसराई आणि गावाला मजामारण्यात बिझी होते.… त्यात माझे यावेळी एकटेच भटकून यायचे ठरले होते. पण काय सांगू अपने मुह मे कोई बात छुपतीच नही.. २५ तारखेला निल्याच्या लग्नादिवशी बकलोच. तरीही काहीजनानीच होकार दर्शवला आणि तुला रात्री सांगतो म्हणाले. रात्री सांगतो म्हणजे यांचा काही नेम नाही हे नक्की असते आणित्यांना रात्री पुन्हा फोन करून खाजवून अवदान आणण्याचा मीही प्रयत्न केला नाही..आमचा सह्यमित्र विक्रांतराव गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाला होता. मलाही तेवढेच हायसे वाटले. गड्याची bike होती ना.. ट्रेनची झनझट नव्हती कि वडापसाठी वाट पाहत बसायची गरज नव्हती. त्यात हा जॉन अब्राहमचा बा...
सफर K2 ची भाग-२ आमच्या गाडीचा driver गुणी माणूस होता. गपचूप काहीही न बोलता सांगेल तिथे गाडी थांबवत असे. आता सूर्य पूर्ण उगवला होता. अलिबागच्या लोकांची तसेच बाहेरून आमच्यासारख्याची दाटीवाटी हळू हळू वाढत होती. अलिबाग जिल्हा कार्यालयासमोरील टपरीजवळ गाडी थांबवली सर्वांचा चहापाणी झाला व एकामागोमाग तर काही घोळक्याने कुलाबा किल्ल्याकडे चालायला सुरुवात केली. ५ मिनिटात आम्ही सर्वजन किनाऱ्यावर आलो. मुलांची फोटोग्राफी  सुरु झाली. इस टाइम आपुनका भी कॅमेरा था. मी सुद्धा सुरु झालो. ओहोटी असल्यामुळे चालत इतिहासावर गप्पा मारत कुलाबा किल्ल्याच्या महाद्वाराजवळ पोचते झालो. महाद्वाराच्या आतील बाजूस पुरातत्व खात्याचे हाफिस आहे. किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून येथे शुल्क आकारले जाते. आम्ही पोहोचलो तेव्हा त्या ऑफिसला टाळा होता शेवटी सरकारी नोकर ना… थोडेसे पुढे गेल्यावर गडाच्या इतिहासाचा माहितीफलक आहे. सर्वाना एकत्र करून अनिरुद्ध ने माहिती सांगितली. रामने गारद दिली आणि गडफेरी साठी निघालो. एक दीड तासात गडफेरी पूर्ण झाली.   किल्ले कुलाब्याचा थोडक्यात इतिह...